Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोश्यारींद्वारे भाजपकडून महापुरुषांची बदनामी, लोकसभेचा दाखला देत पटोलेंचा जोरदार हल्लाबोल

41

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागेवर राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र, भगतसिंग कोश्यारी यांच्या जाण्याचा जल्लोष महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. या बाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी कोश्यारी यांच्यामाध्यमातून करण्यात आली. बदनामीचं काम पूर्ण झाल्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जे यश मिळताना दिसत आहे. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे, असं नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रातील महापुरुषांना बदनाम करण्याचं काम राज्यपालांमार्फत झालं आहे, असं पटोले यांनी सांगितलं. नाना पटोले यांनी गौतम आदानींच्या मुद्यावरुन देखील नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

नाना पटोले आज पुण्यामध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. पत्रकारांनी त्यांना राज्यपालांच्या पायउतार होण्याबाबत विचारला असता ते म्हणाले, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मविआला महाराष्ट्रात ३८ जागांवर यश मिळेल, असा अंदाज सर्व्हेमध्ये दिसून येत आहे. ही स्थिती दिसण्यामागे भगतसिंह कोश्यारी यांचा मोठा वाटा आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राज्यपालांना पायउतार केलं, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

राज्य सरकारची मोठी घोषणा; पत्रकार वारीशेंच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत, मुलाला नोकरीही

आता जो सर्व्हे आलेला आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे ३८ खासदार निवडून येतील असं सांगण्यात आलेलं आहे. हे जे चित्र दिसत आहे त्यामध्ये मोठा वाटा राज्यपालांचा आहे, हे लक्षात आल्यानंतर भाजपने आणि नरेंद्र मोदींनी विचार करत त्यांची पंतप्रधानची खूर्ची कायम राहावी म्हणून हा निर्णय घेतला आहे. देशात भाजपची पुन्हा सत्ता यावी म्हणून हा केलेला एक प्रयत्न आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

शिंदे-फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ, संजय राठोडांच्या पत्नीने गर्दीत शिरून सगळ्यांना शांत बसवलं

महाराष्ट्राची बदनामी जेवढी राज्यपालांकडून करून घ्याची होती ती भाजपने करून घेतली आहे. त्यांना दिलेलं काम झाल्यानं राज्यपालाला पदावरून हटवलं. राज्यपालांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबत टिंगल ज्या प्रकारे त्यांनी केली. ती गोष्ट राज्याची जनता कधी विसरणार नाही, असं राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्रात असा बायस राज्यपाल महाराष्ट्रची बदनामी करण्यासाठी बसवून ठेवला होता, असं नाना पटोले म्हणाले.

हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत, समोर आली मोठी अपडेट

राज्यपालांचा राजीनामा मंजूर पण अद्याप माफी मागितली नाही, सुषमा अंधारेंचा घणाघात

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.