शासनाच्या योजना फक्त कागदोपत्रीच, गावात मूलभूत सुविधा नाहीत, गावकऱ्यांनी गाव विक्रीला काढलं

बीड: गावात मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढण्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पाहावयास मिळाला आहे. पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावात ग्रामस्थांनी गाव विक्रीचे बॅनर लावले आहेत. गावात कसल्याही सुविधा नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनर लावले आहे आणि त्यावर थेट गाव विक्री करण्याची अनुमती मागण्यात आली आहे. एक हजार आठशे लोकसंख्या असलेल्या गावात शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रीच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्याने या गावची सध्या चर्चा जिल्हाभर होत असल्याचे पाहायला मिळतेय.

या गावातील विकास कामासाठी वस्तीसाठी अनेक योजना आल्या मात्र यावर मिळालेला पैसा सरपंच आणि इतर अधिकाऱ्यांनी तो उचलून गावासाठी कोणताही विकास न करता खाल्ले असल्याचा आरोप या गावचे नागरिक करत आहेत. इतक्या वर्षापासून या गावात अनेक गोष्टींचा अभाव आहे या गोष्टी वारंवार तक्रारीच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर मांडूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आता गावकरी संतापले आहेत. त्यामुळे आता गावकऱ्यांनी चक्क गावच विक्रीला काढले आहे.

मोठी बातमी! काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात दोषी
जिल्ह्यात हेच गाव नाही तर अनेक गाव असे आहेत ज्यात लोक राहतात. मात्र कोणत्याही सोईसुविधाविना या गावांमध्ये निवडणुका लढवल्या जातात. ग्रामपंचायतमध्ये सरपंच येतो सदस्य असतात मात्र विकास मात्र कागदोपत्रीच होतोय यासाठी जिल्हा प्रशासन हे उदासीन का असाही सवाल या माध्यमातून पुढे येत आहे. मात्र आता चक्क पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गावातील नागरिकांनी ही अनोखी शक्कल लढवत चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आता गाव विक्री करण्याची मागणी केली आहे. आता यापुढे नेमकं काय घडतंय हे देखील पाहणं गरजेचं आहे

किल्लारीकरांचा संघर्ष संपेना; ३० वर्षांपूर्वी कित्येक संसार गाडले गेले अन् आजही मुलभूत सुविधांची वानवा

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

beed newsCM Eknath Shindeखडकवाडी गावखडकवाडी गाव विक्रीलाखेडेगावाची विक्रीबीड न्यूजबीड बातम्याभ्रष्टाचारसरकारी भ्रष्टाचार
Comments (0)
Add Comment