बारामती लोकसभेच्या जागेबाबत ते म्हणाले, ही जागा कोण लढवणार वगैरे चर्चा सध्या सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मित्र मंडळाकडून ही चर्चा होत नाही. दुसरीकडूनच जाणीवपूर्वक ही चर्चा घडवून आणली जाते. लोकसभेच्या किती जागा आम्ही लढवणार हे इतर पक्ष आम्हाला सांगणार नाही. कारण आम्ही आदेश घेत नाही. आम्ही जेवढ्या जागांवर नेमकेपणाने जिंकू, तेवढ्याच जागा आमच्याकडून लढविल्या जातील, असं सूचकपणे रोहित पवार म्हणाले.
पूर्वीचे राजकारण क्रिकेटसारखे, दोन्ही संघ समोरासमोर खेळायचे पण आता पंच एकाच बाजूने निकाल देणारे
राजकारण आणि क्रिकेटवर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, “पूर्वीचे राजकारण क्रिकेटसारखे होते. दोन्ही संघ समोरासमोर खेळायचे. आता मात्र पंच एकाच बाजूने निकाल देणारे असतील तर मग कुठे तरी बदल होतो. आजचे राजकारण खालच्या पातळीवर सुरु आहे. इथे कोणता संघ जिंकणार, कोणत्या संघाला जिंकवायचे हे आधीच ठरले जाते. त्यामुळे लोकशाही बाजूला राहते. पण क्रिकेटच्या पीचवर आल्यावर मला एक दिशा मिळते. राजकारण कसे असावे, हे समजते. विरोधक कितीही खालच्या पातळीवर गेले तरी राजकारण क्रिकेटसाठी असावे असे मला वाटते”
राज्यात मोकाट रेडे सुटल्याने गुजरातचे भले
राज्यात मोकाट रेडे सुटले आहेत या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानांचा त्यांनी समाचार घेतला. राज्यात मोकाट रेडे सुटल्याने गुजरातचे भले होत आहे. भाजपचे नेते हे महाराष्ट्राचा विचार न करता गुजरातचा विचार करीत आहे असे ते म्हणाले.
शरद पवार यांच्याकडे बघून लोकांचे मतदान
शरद पवार यांनी आजवर आपल्या छत्रछायेत अनेकांना मोठे केले. निवडून आणण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे बघून लोकांनी मतदान केले. सत्तेत पवार यांनी अनेकांना संधी दिली. त्यामुळेच बारामतीचा विकास होवू शकला. आपण मोठे होत असताना जेवढा वाटा आईचा असतो तेवढाच वडिलांचा असतो, असेही ते म्हणाले. अजित पवार यांची पूर्वीची स्टाईल लोकांना आवडायची. त्यांनी आता मतभेद असल्याचे मत व्यक्त केले आहे, पण ही भूमिका त्यांची नसावी, असेही आमदार पवार म्हणाले.