तेरीभी जय मेरी भी जय असं करत आपण दोघ पण विन विन सिच्युएशन मध्ये येऊ. असं ठरवून केलं गेलयं की कायं असं वाटतं, अशी शंका व्यक्त करत मराठा समाजाच्या आरक्षणाप्रश्नी सरकारच्या भूमिकेवर आनंद दवे यांनी टीका केली आहे.
मराठ्यांना दिलेलं आरक्षण म्हणजे फसती दुनिया फसानेवाला चाहिये असं आहे. मराठा समाजाला यातून काहीही नवीन मिळालेलं नाही, फक्त शब्दछल करण्यात आलेला आहे. या राजपत्रावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत, या हरकतींवर नंतर आक्षेप घेण्यात येतील आणि हे प्रकरण पुन्हा एकदा रेंगाळणार आहे, असं आनंद दवे यांनी म्हटलं.
मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं अशी मनोज जरांगेची भूमिका होती, ती नंतर सग्यासोयऱ्यांपर्यंत येऊन का थांबली? असा सवाल देखील दवे यांनी केला. जरांगे जाताना ते सांगून गेले की फसवलं तर परत येऊ.. याचा अर्थ असा आहे की त्यांना आता सुद्धा खात्री नाही की आपल्याला व्यवस्थित आरक्षण मिळालयं किंवा मिळतंय, असं आनंद दवे म्हणाले.
कोणतेही आश्वासनपूर्ती न करता हा मोर्चा गुंडाळला गेला आहे. ‘तेरीभी जय मेरी भी जय असं करत आपण दोघ पण विन विन सिच्युएशन मध्ये येऊ.. असं ठरवून केलं गेलयं की कायं असं वाटतं. आणि मराठा आरक्षणाबाबत येणाऱ्या काळात हिंदू महासंघ योग्य ती भूमिका घेईल, असं देखील आनंद दवे म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News