PM MODI ATTACKS PAKISTAN : त्यांच्या हातात भिकेचे कटोरं; अंबालाच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल

हरियाणा : लोकसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. चार टप्प्यांचे मतदान पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान (२० मे) रोजी पार पडणार आहे. याच अनुषंगाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरियाणा राज्यात प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोदी यांनी आज (१८मे) हरियाणातील अंबाला येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेतून पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. हरियाणातील अंबाला, कुरुक्षेत्र आणि कर्नाल या ठिकाणी मोदींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीच मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे.

सरकार मजबूत असते तेव्हा शत्रू थरथर कापतो

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ”७० वर्षांपासून भारताला त्रास देणाऱ्या आणि हातात बॉम्ब असलेल्या पाकिस्तानच्या हातात आज भिकेचा कटोरा आहे. जेव्हा देशाचे सरकार मजबूत असते तेव्हा शत्रूचा देखील थरकाप होतो.”
‘…तर भाजपचे अस्तित्व राहणार नाही’, राज्यघटना बदलण्याच्या आरोपावरुन खर्गेंचा इशारा

भारतीय सैनिकांचा विश्वासघात करणे हा कॉंग्रेसचा इतिहास

नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यदलावरून कॉंग्रेसवर हल्ला केला आहे. ते म्हणाले की, ”देशातील पहिला घोटाळा काँग्रेसने भारतीय लष्करातच केला होता. काँग्रेस सत्तेत असेपर्यंत हा ट्रॅक रेकॉर्ड कायम ठेवला. बोफोर्स घोटाळा, पाणबुडी घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, परदेशातून शस्त्रे आयात करण्याच्या नावाखाली काँग्रेसवाले भारतीय लष्कराला कमकुवत ठेवायचे असा कॉंग्रेसचा इतिहास होता.”

हरियाणाच्या शिरपेचात देशभक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, ”आज आमचे जुने मित्र रतनलाल कटारिया यांची पुण्यतिथी आहे.त्यांनी संघटनेसह सरकारमध्येही काम केले, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आता ४ जूनला फक्त १७ दिवस उरले आहेत. भारत आघाडीच्या सदस्यांनी देशाविरुद्ध कितीही युक्त्या वापरल्या तरी जनतेने त्यांचा या निवडणुकीच्या मैदानात पराभव केला आहे. हरियाणा हे एक असे राज्य आहे ज्याच्या शिरपेचात देशभक्ती आहे.”

Source link

electionhariyanaloksabhaNarendra Modipakistanrallyअंबालानिवडणूकप्रचारभारतीय सैन्य
Comments (0)
Add Comment