
Tej Police Times
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ”७० वर्षांपासून भारताला त्रास देणाऱ्या आणि हातात बॉम्ब असलेल्या पाकिस्तानच्या हातात आज भिकेचा कटोरा आहे. जेव्हा देशाचे सरकार मजबूत असते तेव्हा शत्रूचा देखील थरकाप होतो.”
‘…तर भाजपचे अस्तित्व राहणार नाही’, राज्यघटना बदलण्याच्या आरोपावरुन खर्गेंचा इशारा
नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यदलावरून कॉंग्रेसवर हल्ला केला आहे. ते म्हणाले की, ”देशातील पहिला घोटाळा काँग्रेसने भारतीय लष्करातच केला होता. काँग्रेस सत्तेत असेपर्यंत हा ट्रॅक रेकॉर्ड कायम ठेवला. बोफोर्स घोटाळा, पाणबुडी घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, परदेशातून शस्त्रे आयात करण्याच्या नावाखाली काँग्रेसवाले भारतीय लष्कराला कमकुवत ठेवायचे असा कॉंग्रेसचा इतिहास होता.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, ”आज आमचे जुने मित्र रतनलाल कटारिया यांची पुण्यतिथी आहे.त्यांनी संघटनेसह सरकारमध्येही काम केले, मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आता ४ जूनला फक्त १७ दिवस उरले आहेत. भारत आघाडीच्या सदस्यांनी देशाविरुद्ध कितीही युक्त्या वापरल्या तरी जनतेने त्यांचा या निवडणुकीच्या मैदानात पराभव केला आहे. हरियाणा हे एक असे राज्य आहे ज्याच्या शिरपेचात देशभक्ती आहे.”
Recover your password.
A password will be e-mailed to you.