नितीशजी यांच्यापेक्षा चांगला पंतप्रधान कोण असेल
पत्रकार परिषदेमध्ये जेडीयू चे आमदार खालिद अन्वर यांना पंतप्रधान पदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना अन्वर म्हणाले की, ”नितीश कुमार यांच्यापेक्षा चांगला पंतप्रधान कोण असू शकतो? नितीशकुमार हे समाज आणि देश समजून घेणारे अनुभवी राजकारणी आहेत. ते सर्व लोकशाही संस्थांचा आदर करतात. आम्ही आता एनडीए आघाडीचा भाग आहोत, परंतु आजही लोकांना नितीश कुमार पंतप्रधान व्हावेत असे वाटते. आजच्या निकालानंतर लोकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.” असे म्हणत जेडीयूकडून कळत न कळत एनडीएवर दबाव टाकला जात असल्याचं बोललं जात आहे.
पवारांकडून नितीश कुमारांना उपपंतप्रधानाची ऑफर?
दरम्यान, भाजपला यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे घटक पक्षांची मदत घेऊन जागांची जुळवा जुळव करावी लागणार असून त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच बरोबर इंडिया आघाडीला जर सत्तेत यायचं असेल तर त्यांना आणखी जागांची गरज आहे. अशातच शरद पवार यांनी नितीश कुमार यांना फोन करून उप पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची बातमी समोर आली होती. परंतु शरद पवार यांनी ती बातमी खोटी असल्याचं सांगितले आहे.