एनडीएच्या मंजूरीनंतर लवकरच केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ४०० पार चा नारा देत भाजपने हवा केली होती पण मतदारांनी एनडीएचा आकडा ३०० च्या खाली आणून ठेवलाय. विरोधकांना गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यंदा चांगला निकाल मिळलाय. मात्र इंडिया आघाडी सत्तास्थापनेपासून शंभर पावले मागे आहे.
एनडीएच्या बैठकीत २६ पक्षांचे २१ नेते हजर झाले होते. सुत्रानुसार सात जूनला एनडीएच्या निवडून आलेल्या सर्वच खासदारांची बैठक दिल्लीत होणार आहे. यानंतर एनडीए राष्ट्रपतींकडे सत्तास्थापेनाचा दावा करेल अशी माहिती मिळते. राजनाथ सिंह, अमित शाह आणि जे.पी नड्डा यांच्याकडे मित्रापक्षांसोबत बोलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आजच्या बैठकीत सीएम शिंदे सुद्धा दाखल झाले होते तर अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल दाखल झाले होते.
लोकसभेत सत्तास्थापनेसाठी साधारण २७२ जागांची आवश्यकता असते मोदी सरकारने २४० जागांवर विजय मिळवला त्यामुळे त्यांना जेडीयु आणि टीडीपी यांची साथ सत्तास्थापनेसाठी लागणार आहे. टीडीपीला १६ जागांवर तर जेडीयुला १२ जागांवर विजय मिळलाय त्यामुळे भाजपच्या सत्तास्थापनेत या दोन पक्षांचा किंग मेकर म्हणून समावेश आहे. तर राज्यात शिंदे गटाला सात जागांवर यश मिळाले त्यामुळे एनडीएत शिंदेंची सेना तिसऱ्या क्रमांकावर आहे.