लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर राऊत काय म्हणाले?
के सुरेश सर्वात लोकसभेतील वरिष्ठ सदस्य आहे पण फक्त काँग्रेसचे असल्याने त्यांना डावलले जाते आणि त्यांचापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या सदस्यांना जबाबदारी दिले जाते म्हणजे भाजपाचा सुंभ जळला तरी पिळ कायम आहे अशी टीका राऊतांनी केली. गेली दहावर्ष मोदी – शाहांच्या अटीवरच लोकसभा चालली पण आता ते शक्य नाही, आता मोदींना विरोधीपक्षांचा सामना करावाच लागेल. इंडिया आघाडीने घटनेत नमूद केल्याप्रमाणे उपअध्यक्ष पद मागितले होते पण एनडीएने विरोध केला नाइलाजास्तव आता आम्हाला निवडणुकीला सामोरे जावे लागेल. राहुल गांधी आता विरोधीपक्ष नेते आहेत त्यामुळे मोदींना आता संसदेत राहुल गांधींना रामराम करावाच लागेल, संसदेतून पळ काढता येणार आहे. राहुल गांधींनी विरोधीपक्ष नेतेपद स्विकारले इंडिया आघाडी राहुल गांधींचे आभारी आहे.
पॅलेस्टाइनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का? संजय राऊतांचा सरकारला सवाल
पीएम मोदींना सुद्धा हा नर संहार मान्य नाही मग सरकारने भूमिका काय ती जाहीर करावी, ओवेसी जर काहीचे चुकीचे म्हणालेत असे सरकारला वाटते तर त्यांनी कारवाई करावी, पण युक्रेन आणि पॅलेस्टाइनमध्ये सुरु असलेल्या नर संहाराची जगाला चिंता आहेत. त्यामुळे पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे काही चुकीचे नाही असे राऊत म्हणाले.