Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/all-in-one-seo-pack/app/Common/Meta/Robots.php on line 89

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php:6121) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/feed-rss2.php on line 8
ram temple consecration - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज Tue, 23 Jan 2024 03:47:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://tejpolicetimes.com/wp-content/uploads/2024/01/cropped-tejpolicetimes-logo-32x32.jpg ram temple consecration - TEJPOLICETIMES https://tejpolicetimes.com 32 32 रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी https://tejpolicetimes.com/?p=79846 https://tejpolicetimes.com/?p=79846#respond Tue, 23 Jan 2024 03:47:28 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79846 रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

नागपूर: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढल्या. मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे सूर कानी पडू लागले. लाइव्ह कार्यक्रमाची विशेष व्यवस्था केली. दुपारी मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच रामनामाचा गजर झाला. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत व्यापले आणि संपूर्ण विदर्भ रामनामी रंगला.भंडाऱ्याचे ग्रामदैवत श्री बहिरंगेश्वर मंदिरात सकाळपासूनच […]

The post रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

नागपूर: अयोध्येतील सोहळ्यानिमित्त सोमवारी सकाळपासूनच संपूर्ण वातावरण राममय होऊ लागले. घरोघरी भगवे झेंडे, फुलांची सजावट, रोशणाई करून अंगणात रांगोळ्या काढल्या. मंदिरांमध्ये भजन, कीर्तनाचे सूर कानी पडू लागले. लाइव्ह कार्यक्रमाची विशेष व्यवस्था केली. दुपारी मंदिरात श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताच रामनामाचा गजर झाला. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत व्यापले आणि संपूर्ण विदर्भ रामनामी रंगला.

भंडाऱ्याचे ग्रामदैवत श्री बहिरंगेश्वर मंदिरात सकाळपासूनच अखंड रामनामाचा जप करण्यात आला. मंदिर परिसरात ५१ फूट उंच ध्वज लावण्यात आले. सायंकाळी भजनसंध्या झाली. लाखनी तालुक्यातील पालांदूरला अयोध्येसारखे सजविण्यात आले होते. तुमसर, पवनी, पालांदूर, कवलेवाडा व मेंगापूर येथील मंदिरात रामनामाचा गजर झाला. गोंदियात महाआरती केल्यानंतर मिरवणुका निघाल्या. अयोध्येतील सोहळ्याने चंद्रपुरातील तीन दिवसीय उत्सवाची सोमवारी सांगता झाली. तत्पूर्वी रामायणातील प्रसंगांवर आधारित नाटक सादर झाले. यात ५०हून अधिक कलाकारांनी भूमिका साकारल्या. सांस्कृतिक कार्यक्रमात २०० कलाकारांचा सहभाग होता. यंग चांदा ब्रिगेडच्यावतीने महानगरपालिकेच्या प्रांगणावर भजनसम्राट दिनेश शर्मा यांच्यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. विविध ११ प्रकारच्या तांदळापासून तयार पदार्थांचे महाप्रसाद वितरीत करण्यात आले. वाशीमसह मंगरुळपीर, मालेगाव, कारंजा, कोलार येथील राममंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. मालेगावात भाजयुमोने ५००१ दिव्यांचे तर संतोष शिंदे यांनी ७१ हजार लाडूंचे वाटप केले.

नाशिकच्या महाशिबिरानंतर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला सत्तेत आणलेलंं, उद्धव ठाकरे इतिहासाची पुनरावृत्ती घडवणार?

दिव्यांनी उजळले ‘श्रीं’चे मंदिर

बुलढाणा जिल्ह्यातील संतश्रेष्ठ गजानन महाराज संस्थान शेगाव, श्री प्रल्हाद महाराज मंदिर साखरखेर्डा आणि श्री क्षेत्र माकोडी येथे अयोध्येतील सोहळ्याचा उत्सव झाला. श्रींच्या मंदिर परिसरात तोरण, केळीचे खांब, रंगबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती. शंख, नगारा वादन, पुष्पवृष्टी आणि महाआरती झाली. सायंकाळी दीपोत्सवाने मंदिर उजळले होते. बुलढाणा अर्बनच्यावतीने रामभक्तांना लाडूची वीस हजारांहून अधिक पाकिटे वितरित करण्यात आली. संस्थेच्या मुख्य शाखेच्यावतीने गोवर्धन इमारतीसमोर संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, डॉ. सुकेश झंवर व संस्थेचे सरव्यवस्थापक कैलाश कासट यांच्याहस्ते हे लाडूवाटप झाले. रूद्र ढोल-ताशा पथकाने तब्बल ५०१ दिव्यांनी ‘जय श्रीराम’ साकारले. खामगावात भाजपने ४० हजार श्रीराम रक्षा स्रोताचे वाटप करण्यात आले. तर लोणारमध्ये मोटारसायकल रॅली लक्षवेधी ठरली.

हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

गडचिरोली : अयोध्या येथे श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह गडचिरोली जिल्ह्यात दिसला. अनेक ठिकाणी कलशयात्रा व मिरवणुका निघाल्या. आरमोरी येथे राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. चंदू बेहरे, सागर मने, भूषण सातव, नितीन जोध, प्रदीप सेलोकर, अंकुश खरवडे, सुनील खोब्रागडे, बाळू हेमके यांनी स्वखर्चातून हे हेलिकॉप्टर मागविले होते. या हेलिकॉप्टरने मंदिराला फेरी घालून पुष्पवृष्टी केली. यासोबतच सिरोंचा, एटापल्ली, भामरागडपासून ते कोरचीपर्यंत सर्वत्र कार्यक्रम झाले.

कारसेवकांच्या संघर्षामुळे स्वप्नपूर्ती : फडणवीस

कॅप : अमरावतीच्या हनुमान गढी परिसरात आयोजित कारसेवकांच्या सत्कार सोहळ्यात विचार व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे व मान्यवर.

अमरावती : राम मंदिराच्या आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी होतो. लाठ्या-काठ्या खाल्ल्या. कारागृहातही गेलो. हजारो कारसेवकांच्या संघर्षामुळेच आज राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले, असे भावपूर्ण उद्‌गावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. अयोध्येतील मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून हनुमान गढी परिसरात कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. अनिल बोंडे, नवनीत राणा, आमदार रवी राणा यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा स्वाभिमानी पक्षातर्फे ११ लाख बुंदीच्या लाडूंचेही वाटप करण्यात आले. बडनेरा मार्गावरील दसरा मैदानावर भाजप नेते तुषार भारतीय यांच्या मित्र परिवारातर्फे गंगा आरती करण्यात आली.अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्व मंदिरांमध्ये सकाळपासूनच पूजा अर्चना करण्यात आली. श्री अंबादेवी मंदिर, भक्तिधाम, सतीधाम, राम मंदिर रोशणाईने उजळले होते. श्री व्यंकटेश बालाजी भगवान मंदिरात ११ दिव्यांचा उत्सव साजरा झाला.

जालन्यात वकिलाने लाखो खर्चून उभारलं राम मंदिर; अयोध्येप्रमाणे आजच केली श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा

Source link

The post रामनामात रंगला विदर्भ, अयोध्येतील सोहळ्याचा गावागावात जल्लोष, राम मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79846 0
‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल https://tejpolicetimes.com/?p=79676 https://tejpolicetimes.com/?p=79676#respond Mon, 22 Jan 2024 04:58:32 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79676 ‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एकट्या मुंबईत पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा आकडा समोर आला आहे. प्रामुख्याने भगवे झेंडे, पताकांसह पारंपरिक वेष, कुर्ते या माध्यमातून ही उलाढाल झाली. यामुळे मुंबईतील वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.अयोध्येत सोमवार, २२ जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. यासाठी संपूर्ण देशात उत्साह […]

The post ‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एकट्या मुंबईत पाच हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा आकडा समोर आला आहे. प्रामुख्याने भगवे झेंडे, पताकांसह पारंपरिक वेष, कुर्ते या माध्यमातून ही उलाढाल झाली. यामुळे मुंबईतील वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अयोध्येत सोमवार, २२ जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. यासाठी संपूर्ण देशात उत्साह असताना मुंबईनगरीदेखील सजली आहे. त्याअंतर्गत जागोजागी मंदिरे सजविण्यात आली आहेत, तर अनेक वस्त्यांमध्ये झेंडे, पताका, तोरण लावण्यात आली आहेत. यानिमित्ताने वेगवेगळ्या भागांत रथयात्रा, यज्ञ, होमहवन होत आहेत. यांत सहभागी होणाऱ्या भक्तांकडून पारंपरिक वेषभूषा खरेदी करण्यात आली. या सर्व माध्यमातून मोठी उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘सर्वाधिक मागणी कापडाचे तोरण, श्रीरामाचे चित्र असलेले भगवे तोरण व भगव्या पताकांना आहे. मागील तीन दिवसांत ती मोठ्या प्रमाणात वाढली. त्याआधी भगव्या आणि पिवळ्या रंगाचे कुर्ते, पारंपरिक कपडे खरेदी करून यासंबंधीच्या सोहळ्यांमध्ये नागरिक सहभागी होत होते. त्यामुळे त्यांचीदेखील मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. परिणामी मुंबईतील वस्त्रद्योगाकडे भरमसाठ काम आले. एकप्रकारे या वस्त्रोद्योगाला संजीवनी मिळाली’, असे याबाबत अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) महाराष्ट्र सरचिटणीस शंकर ठक्कर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

सर्वच क्षेत्रांत मोठी उलाढाल

या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रांत उलाढाल झाली आहे. प्रभू श्रीरामाचे चित्र असलेल्या चांदीच्या नाण्यांना मागणी सध्या मोठी आहे. अनेकांनी २२ जानेवारीला चांदीच्या नाण्यांची खरेदी करण्यासाठी बुकिंग करून ठेवले आहे. त्या क्षेत्रातील उलाढाल १९ लाख रुपयांच्या घरात आहे. त्याखेरीज श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती, शुभेच्छापत्र, मोठमोठे कटआऊट तयार करण्याच्या क्षेत्रातील उलाढाल वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई-अयोध्या विमान, तिकीट १० हजारांपुढे

राम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विमानसेवा कंपन्यांनी अयोध्येसाठी उड्डाण सुरू केले आहे. मुंबईकरांनी यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे एरवी चार हजार रुपयांच्या घरात असलेले विमान तिकीट आता १० हजार रुपयांवर गेले आहे.

मुंबईहून सध्या केवळ इंडिगो एअरलाइन्सची सेवा सुरू आहे. ती १५ जानेवारीला सुरू झाली. शनिवारपर्यंतचे या सेवेचे तिकीट चार हजार रुपयांच्या घरात होते. सोमवारचे तिकीट मात्र ११ हजार ४९९ रुपयांपर्यंत पोहोचले. मंगळवारचे तिकीट आठ हजार ३५० रुपये आहे. मात्र त्यानंतर सलग हे तिकीट १० हजार रुपयांच्यापुढे आहे. २६ जानेवारीला सुट्टीच्या निमित्ताने अनेकांनी अयोध्येला जाण्याचे नियोजन केल्याने पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परिणामी तिकीट दर वाढले आहेत. त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे तिकीट दरदेखील सहा हजार रुपयांहून अधिक आहेत.

Source link

The post ‘कोट्यवधीं’ची प्राणप्रतिष्ठा; वस्त्रोद्योगाच्या हाती भरमसाठ काम, एकट्या मुंबईत ५ हजार कोटींची उलाढाल first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79676 0
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह https://tejpolicetimes.com/?p=79707 https://tejpolicetimes.com/?p=79707#respond Mon, 22 Jan 2024 04:42:18 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79707 राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह

म. टा. प्रतिनिधी, लातूर: अयोध्येत आज, सोमवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लातूरमध्ये रविवारी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आबालवृद्ध नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध संस्था, संघटना, मंडळांचे कार्यकर्ते या कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन करीत आहेत. व्यापारी वर्गाचा उत्साहही वाखणण्याजोगा आहे. गांधी चौक, हनुमान […]

The post राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह

म. टा. प्रतिनिधी, लातूर: अयोध्येत आज, सोमवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लातूरमध्ये रविवारी मोठ्या जल्लोषात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आबालवृद्ध नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामभक्तांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध संस्था, संघटना, मंडळांचे कार्यकर्ते या कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन करीत आहेत. व्यापारी वर्गाचा उत्साहही वाखणण्याजोगा आहे. गांधी चौक, हनुमान चौक, सराफ लाइन, गंजगोलाई, विवेकानंद चौक, ठाकरे चौक, छत्रपती शिवाजी चौकातील व्यापाऱ्यांनी समोरच्या दर्शनी भागातील रस्त्यावर ही विद्युत रोषणाई केली आहे.

राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी! श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्येत दिवाळी, रामरंगात रंगले शहरवासी

शहराच्या विविध भागांत रविवारीच रामरथाच्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. महिला, तरुणांचा उत्साह दिसून येत आहे. लातुरातील पुरातन श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम होत आहेत. माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सूरतशहावली दर्गाला चादर अर्पण करून त्यांच्या परिसरात सुरुवात केली आहे.

लातुरातील जुना औसा रोड भागातील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी एकत्र येत मिरवणूक काढली आहे. या यात्रेत मंदिर विश्‍वस्त इंद्रजित ठाकूर, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेवक शोभा पाटील, व्यंकटेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती आहे. या यात्रेत भजनीमंडळ, भगवे वस्त्र परिधान केलेल्या महिला, तरुणांचा मोठा सहभाग आहे. परिसरातील सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर, ओंकार हनुमान मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात येणार असून, अयोध्या कॉलनीतील श्रीराम मंदिरात त्याचा समारोप होणार आहे.

श्री केशव मित्र मंडळच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. केशवनगरमधील वीर हनुमान मंदिर येथून निघालेली ही मिरवणूक केशवनगर, अंबा हनुमान, कॉकसिट कॉलेज, शारदा कॉलनी, बँक कॉलनी, केशवनगर, इंडियानगर या भागातून काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. नागरिकांनी जागोजागी यात्रेचे फटाके वाजवून स्वागत केले. सडा, रांगोळ्या, भगव्या पताका, श्रीराम मूर्तीचे भव्य फलक यांनी रस्ते सजले होते. मिरवणुकीत रामरथावर श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमान रूपात मुले विराजमान झाली होती. भव्य श्रीराम प्रतिमा वेगळ्या रथावर लावण्यात आली होती. मिरवणुकीत उंट, घोडे सजलेल्या स्वारासहित सहभागी झाले. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी केशव मित्र मंडळाचे अध्यक्ष सर्वोत्तम कुलकर्णी, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगरसेविका सपना किसवे, कीर्ती धूत, विलास आराध्ये, मुरलीधर दीक्षित, किशोर कुलकर्णी, कांचन भावठाणकर, संजय निरगुडे, पोटे, अजय सूळ, अजय रेणापूरे आदींनी परिश्रम घेतले.

डोंबिवलीत विश्वविक्रमी दीपोत्सव; १ लाख ११ हजार १११ दिव्यांनी साकारली श्रीरामाची प्रतिमा

Source link

The post राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अवघा मराठवाडा राममय, लातूर शहरामध्ये मिरवणुकीचा उत्साह first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79707 0
रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख https://tejpolicetimes.com/?p=79809 https://tejpolicetimes.com/?p=79809#respond Mon, 22 Jan 2024 03:52:52 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79809 रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख

मुंबई: विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल सन २००२च्या उन्हाळ्यात बेंगळुरूतील आश्रमात मला भेटण्यासाठी कांचीपुरमहून आले होते. तिथे त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली होती. शंकराचार्य आणि प्रमुख मुस्लिम नेत्यांमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर सिंघलजी मला भेटायला आले होते. रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा आणावा […]

The post रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख

मुंबई: विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल सन २००२च्या उन्हाळ्यात बेंगळुरूतील आश्रमात मला भेटण्यासाठी कांचीपुरमहून आले होते. तिथे त्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या संदर्भात कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली होती. शंकराचार्य आणि प्रमुख मुस्लिम नेत्यांमधील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर सिंघलजी मला भेटायला आले होते. रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा आणावा आणि राममंदिर उभारणीचा मार्ग तातडीने मोकळा करावा, हे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजींना मी पटवून द्यावे हे सांगण्यासाठी ते आश्रमात आले होते. ‘त्यासाठी वाजपेयीजी चालवत असलेले आघाडी सरकार कोसळले तरी चालेल. मला त्याची पर्वा नाही,’ असे ते मला म्हणाले होते. विशेष म्हणजे, राम मंदिरासाठी बेमुदत उपोषण करताना त्यांना जबरदस्तीने खाऊ घातल्याने त्या वेळी सिंघलजी वाजपेयींशी बोलत नव्हते.

त्या वेळी ७६ वर्षीय अशोकजींच्या डोळ्यांत एक उत्कट चैतन्य आणि एक चमक होती. ती चमक उत्कटता, धार्मिक संताप आणि निराशा दर्शवत होती. ‘राम मंदिर कधी बांधले जाईल का? माझ्या हयातीत मला ते पाहायला मिळेल का,’ असा प्रश्न त्यांनी मला विचारला. तेव्हा मला आतून असे वाटले, की आणखी किमान १४ वर्षे हे घडणार नाही. मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही प्रार्थना करा. तुमच्या वचनबद्धतेने सर्व शक्य आहे.’ माझ्या या बोलण्याने पूर्ण समाधान न झालेले अशोकजी आश्रमातून निघून गेले.

प्रभू श्रीरामांची कुलदेवता

दुसऱ्या दिवशी सकाळी ध्यान करताना, मला एका जीर्ण झालेल्या देवी मंदिराचे दर्शन झाले, ज्याचे पुनरुत्थान करणे आवश्यक होते. त्या वेळी मी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी तमिळनाडूतील एक वयोवृद्ध नाडी सिद्धपुरुष आश्रमात आले आणि त्यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. प्राचीन ताडपत्रे वाचत असताना ते हळूवारपणे म्हणाले, ‘गुरुदेव, रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दोन्ही समुदायांना एकत्र आणण्याची भूमिका बजावावी लागेल असे यात लिहिले आहे. यात हेही दिसून येते, की देवकाली या प्रभू श्रीरामांच्या कुलदेवीचे मंदिर खूपच दुर्लक्षित आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याशिवाय अयोध्येतील राम मंदिराभोवतीचा हिंसाचार आणि संघर्ष संपणार नाही.’ हे करायलाच हवे, असे सांगताना त्यांच्या बोलण्यात निकड आणि दृढ विश्वासाची भावना होती.

अयोध्येत दोन काली मंदिरे

देवकाली देवीच्या अशा मंदिराच्या अस्तित्वाची माहिती त्या नाडी सिद्धपुरुषाला किंवा मलाही नव्हती. काही सूत्रांद्वारे आणि चौकशीअंती अयोध्येत दोन काली मंदिरे असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यातील एक मंदिर शहराच्या मध्यभागी होते, त्याला लहान देवकाली मंदिर असे म्हणतात आणि दुसरे मंदिर थोडेसे दूर होते. ते देवकाली मंदिर म्हणून ओळखले जात असे. या देवकाली मंदिराचे बांधकाम मोडकळीस आले होते. त्यातील मध्यवर्ती तलावात कचरा टाकून लोकांनी त्याचे डम्पिंग ग्राउंडच केले होते. मंदिराच्या नूतनीकरणाचे आणि तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू करण्यासाठी मी नवी दिल्ली आणि लखनौ येथील आमच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत त्यांनी हे काम यशस्वीपणे पूर्ण केले.

देवकाली मंदिरात १९ सप्टेंबर २००२ रोजी सकाळी पुन: प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आमच्या आश्रमातील पंडितांच्या गटाने माझ्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडला. पवित्र अग्नीत पूर्णाहुती अर्पण करताना मला या मंदिराच्या वृद्ध पुजाऱ्याच्या डोळ्यांत आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू दिसले. देवकाली देवी तिच्या संपूर्ण वैभवात चमकत होती. देवकाली मंदिरातील पूजेनंतर, शहरात जातीय हिंसाचारामुळे कोणताही रक्तपात किंवा दंगल झाली नाही. एक भविष्यवाणी पूर्ण झाली होती…अशोकजी सिंघलही त्या दिवशी उपस्थित होते. मात्र, राम मंदिराच्या मुद्द्यावर अंतिम निर्णय होण्यासाठी आणखी १४ वर्षे लागतील या पूर्वकल्पनेवर मी ठाम होतो. त्या संध्याकाळी देवकाली मंदिर परिसरात संत समागम झाला, ज्यामध्ये आम्ही हिंदू आणि सुफी संतांना निमंत्रित केले होते. एक हजारांहून अधिक लोक सत्संगात सहभागी झाले होते. रामजन्मभूमीचा वाद शांततेत सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रार्थना केली. मी मुस्लिम नेत्यांचा सन्मान करीत असताना त्यांनी मला तुलसी रामायणसोबत कुराणाची एक प्रत दिली आणि श्रीरामांवर त्यांची नितांत श्रद्धा असल्याचे सांगितले. त्यांच्या हावभावात बंधुत्वाचा निस्सीम भाव होता. याने माझा विश्वास दृढ केला, की केवळ निहित स्वार्थ असलेल्यांनाच दोन समाजांमध्ये फूट पडावी, असे वाटत असते.

शतकानुशतके चाललेल्या या संघर्षात पुरेसे रक्त सांडले होते. त्यामुळे आता काळाच्या कसोटीवर टिकणारा तोडगा हवा होता. हे लक्षात घेऊन सन २००३मध्ये मी न्यायालयाबाहेर परस्पर सामंजस्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, मुस्लिम समाज सद्भावना म्हणून हिंदूंना रामजन्मभूमी भेट देईल आणि त्या बदल्यात हिंदू त्यांना मशिदीच्या बांधकामासाठी पाच एकर जमीन देतील. यातून दोन्ही समाजांतील येणाऱ्या पिढ्यांसाठी बंधुभावाचा स्पष्ट संदेश जाईल.

देवकालीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अशोकजींनी मला प्रयागराज (त्या वेळचे अलाहाबाद) येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी बोलावले. सामूहिक ध्यानाचे मार्गदर्शन केल्यावर मी अशोकजींना सांगितले, की रामजन्मभूमीचा वाद सोडवण्यासाठी केवळ मानवी प्रयत्न पुरेसे नसून, ईश्वरी इच्छाही आवश्यक आहे. कोणत्याही कृतीच्या फलश्रुतीमध्ये मानवी प्रयत्नांसोबतच ईश्वरी इच्छाही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यासाठी संयमाची गरज असते. मी त्यांना सुचवले, की त्यांनी या प्रकरणी घाई करू नये. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ते अधिक निश्चिंत आणि आश्वस्त दिसले. वाजपेयी सरकारच्या विरोधातील आपली भूमिकाही त्यांनी मवाळ केली.

या घटनेनंतर काही कालावधी गेला. सन २०१७मध्ये दोन्ही समाजांच्या नेत्यांच्या आग्रहानुसार आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेमुळे मी रामजन्मभूमी प्रकरणात मध्यस्थी करण्याचे माझे प्रयत्न पुन्हा सुरू केले. सरतेशेवटी, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. मंदिराच्या बांधकामासाठी रामजन्मभूमीची जमीन आणि मशीद बांधण्यासाठी पाच एकर जागा निश्चित केली. हा एक महत्त्वाचा प्रसंग होता, कारण ५०० वर्षे जुन्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा निघाला होता.

– गुरुदेव श्री श्री रविशंकर

Source link

The post रामजन्मभूमी संघर्ष आणि कालीमाता, श्री श्री रविशंकर यांचा विशेष लेख first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79809 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, जाणून घ्या कारण https://tejpolicetimes.com/?p=79542 https://tejpolicetimes.com/?p=79542#respond Sun, 21 Jan 2024 08:34:13 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79542 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, जाणून घ्या कारण

मुंबई: अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १२.१५ ते १२.४५ या वेळेत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थिती लावण्यास उत्सुक आहेत. […]

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, जाणून घ्या कारण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, जाणून घ्या कारण

मुंबई: अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. सोमवारी दुपारी १२.१५ ते १२.४५ या वेळेत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थिती लावण्यास उत्सुक आहेत. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजीच्या या सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती ‘एक्स’ वरुन दिली आहे.

अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स अकांऊटवरुन दिली आहे.

राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली
कोणाला कोणाला निमंत्रण

या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध खात्यांचे मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, कलाकार आणि साधू-संतांसह तब्बल सात हजारांहून अधिकजणांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. दरम्यान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहलीपासून अमिताभ बच्चन यांसारखे अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाला घेऊन रामलल्लाच्या दर्शनाला कधी जाणार हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे.

टाटा मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांचा उत्साह; मुख्यमंत्र्यांसह इतर नेतेही उपस्थित

Source link

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, जाणून घ्या कारण first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79542 0
राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली https://tejpolicetimes.com/?p=79540 https://tejpolicetimes.com/?p=79540#respond Sun, 21 Jan 2024 08:07:45 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79540 राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली

मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनानिमित्त राज्य सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला होता. रविवारी सुट्टी दिवशी न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठासमोर ऐतिहासिक सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांनी […]

The post राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली

मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनानिमित्त राज्य सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला होता. रविवारी सुट्टी दिवशी न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठासमोर ऐतिहासिक सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांनी आणि सरकारच्या वतीने महाधिवक्ता डॉ . बिरेंद्र सराफ यांनी जोरदार युक्तिवाद केले. राममंदिर प्रतिष्ठापनेबाबत सार्वजनिक सुटी जाहीर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात चार विधी विद्यार्थ्यांनी केलेली जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली.

‘विशेषत: कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी असताना या याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी अशी जनहित याचिका करताना खूप काळजी घेणे आवश्यक होते असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच याचिकाकर्त्यांनी केंद्र सरकारच्या ८ मे १९६८ रोजीच्या अधिसूचनेला आव्हान देताना त्याला रीतसर आव्हानच दिलेले नाही. इतकेच नव्हे तर याचिकेत सुप्रीम कोर्टाच्या जुन्या निवाड्यातील निरीक्षणांबाबतही बेछूट व आक्षेपार्ह विधाने केली आहेत. विधी विद्यार्थ्यांकडून अशी याचिका करण्यात येताना असे अजिबात अभिप्रेत नाही. त्यामुळे ही याचिका जनहित याचिका नसून काही तरी खासगी हितसंबंध आणि प्रसिद्धीपोटी केलेली जनहित याचिका असल्याचे दिसत आहे. खरे तर अशा प्रकारची याचिका केल्याबद्दल आम्ही याचिकाकर्त्यांना जबर दंड लावण्याकडे आमचा कल होता. मात्र, याचिकाकर्ते हे विद्यार्थी असल्याचे लक्षात घेऊन आम्ही दंडाचा आदेश देण्याचे टाळत आहोत. मात्र, भविष्यात या विद्यार्थ्यांनी व्यक्तिश: अशाप्रकारची निरर्थक व चुकीची याचिका करण्याची चूक करू नये, अशी सक्त ताकीद देऊन आम्ही ही याचिका फेटाळत आहोत’’, असे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले.

देवेंद्र फडणवीसांनी पुरावाच दाखवला; अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांच्या घोळक्यातील स्वत:चा फोटो ट्विट
‘८ मे १९६८च्या अधिसूचनेप्रमाणे सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा राज्य सरकारला अधिकारच नाही. तो अधिकार केंद्र सरकारला आहे’, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. मात्र, ‘त्या अधिसूचनेला आव्हान दिलेले असताना त्या अधिसूचनेची प्रतच याचिकेत जोडलेली नाही, त्यामुळे त्या विनंतीचा विचार करणे कठीण आहे’, असे मत खंडपीठाने नोंदवले. विद्यार्थ्यांच्या या याचिकेला अनेक हस्तक्षेप अर्जांद्वारे तीव्र विरोध करण्यात आला. एका अर्जदाराने तर ही याचिका दंड लावून फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली. ‘धर्म निरपेक्षतेच्या तत्त्वाचाच चुकीचा अर्थ घेतला जात आहे त्यातूनच याचिकाकर्त्यांनी ही चुकीची याचिका केली आहे. आपल्या देशात वेगवेगळ्या धर्मांच्या सोहळ्यासाठी सुट्या जाहीर होत असतात. विधी विद्यार्थ्यांचा उत्साह चांगला आहे हे समजू शकतो पण त्यांनी त्यांची ही ऊर्जा अन्यत्र व विधायक कामासाठी लावली तर चांगले होईल’,असे एका हस्तक्षेप अर्जदारातर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांना सल्ला दिला.

अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कोल्हापुरात १०८ फुटी कटआऊट

Source link

The post राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिनी सार्वजनिक सुट्टीवर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79540 0
केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून…, राममंदिर सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान https://tejpolicetimes.com/?p=79530 https://tejpolicetimes.com/?p=79530#respond Sun, 21 Jan 2024 05:52:22 +0000 https://tejpolicetimes.com/?p=79530 केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून…, राममंदिर सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई: अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने उद्या, २२ जानेवारी रोजी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुटीला आव्हान देणाऱ्या सार्वजनिक सुटीला याचिकेवर मुंबई हायकोर्टात विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. रविवारच्या सुटीच्या दिवशी न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठासमोर ऐतिहासिक सुनावणी होत आहे. राज्य सरकारचा निर्णय हा धर्म निरपेक्षतेच्या मूळ […]

The post केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून…, राममंदिर सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून…, राममंदिर सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई: अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने उद्या, २२ जानेवारी रोजी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुटीला आव्हान देणाऱ्या सार्वजनिक सुटीला याचिकेवर मुंबई हायकोर्टात विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. रविवारच्या सुटीच्या दिवशी न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठासमोर ऐतिहासिक सुनावणी होत आहे. राज्य सरकारचा निर्णय हा धर्म निरपेक्षतेच्या मूळ तत्त्वांच्या आणि राज्यघटनेच्या मूळ त्तत्वांच्या विरोधात कसे आहे, हे दाखवण्यासाठी याचिकाकर्त्या चार विधी विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थिनीने सुप्रीम कोर्टच्या काही निवाड्यांचा दाखला खंडपीठाला दिला.

केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून धर्म निरपेक्षतेच्या व राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करत सरकारने हा निर्णय घेतला आहे”, असा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे. तसेच सुटी रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सुनावणीला राज्य सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ हे उपस्थित असून त्याशिवाय अनेक बडे वकील उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांच्या या याचिकेला विरोध दर्शवण्यासाठी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील याही मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत चुकीची माहिती पसरवू नका, केंद्र सरकारचा माध्यमांना इशारा

८ मे १९६८च्या अधिसूचनेप्रमाणे सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा राज्य सरकारला अधिकारच नाही. तो अधिकार केंद्र सरकारला आहे. असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. मात्र, “तुम्ही त्या अधिसूचनेला आव्हान दिलेले असताना त्या अधिसूचनेची प्रतच याचिकेत जोडलेली नाही, त्यामुळे त्या विनंतीचा विचार करणे कठीण आहे”, असे मत खंडपीठाने नोंदवले. आमच्याकडे आता त्या अधिसूचनेची प्रत नाही. मात्र तसे असले तरी मुळात कायद्याप्रमाणेच राज्य सरकारला सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा अधिकार नाही असा विद्यार्थिनी शिवानी अगरवाल यांनी खंडपीठासमोर युक्तिवाद केला.

“सार्वजनिक सुटी जाहीर करायची की नाही, हा पूर्णपणे राज्य सरकारचा धोरणात्मक भाग असल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी केला.सरकारचा निर्णय हा जुलमी व मनमानी आहे. असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे पण राज्य सरकार आपल्या अधिकारात वेगवेगळ्या दिवसांना सार्वजनिक सुटी जाहीर करत असते आणि जेव्हा धार्मिक रीती रिवाज किंवा सोहळे, हे अत्यावश्यक भाग असतात त्यावेळी वेगवेगळ्या धर्मासाठी सरकार असे निर्णय घेत असते. त्यामुळे धार्मिक आधारावर घेतलेला सरकारचा निर्णय मनमानी व बेकायदा आहे, असे म्हणता येत नाही. तसेच आपल्या धर्मनिरापेक्षतेचे तत्त्व हे इतके नाजूक नाही. आपल्या देशाचे नागरिक हे सर्व धर्मांचे सोहळे एकोप्याने साजरे करत असतात. याचिकाकर्ते हे केवळ एका गटाचा विचार करून अर्थ काढत आहेत असा युक्तिवाद महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठासमोर केला. अद्याप या याचिकेवरील युक्तिवाद सुरु असून न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

अयोध्येत राम मंदिर उत्सव, कुंभार बांधवांची लगबग; लाखो मातीच्या पणत्यांची निर्मिती, प्रचंड मागणी

Source link

The post केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून…, राममंदिर सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान first appeared on TEJPOLICETIMES.

]]>
https://tejpolicetimes.com/?feed=rss2&p=79530 0