
Tej Police Times
लोकसभेत बजेटवर चर्चा करताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाभारतातील दाखला देत सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, ‘महाभारत काळात ज्या प्रकारे अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये अडकवले गेले होते, त्या प्रकारे देशाला चक्रव्यूहमध्ये अडकवले जात आहे.’ राहुल गांधी म्हणाले, ‘चक्रव्यूह चे नियंत्रण ६ लोक करत होते. आता २१व्या शतकातही देशात असाच चक्रव्ह्यू बनला आहे. राहुल गांधी यांच्या टीकेनंतर देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे, दरम्यान हा राजकीय वाद बाजूला ठेवत आपण जाणून घेऊ की चक्रव्यूहची खरी गोष्ट काय आहे? जाणून घेऊ अभिमन्यू कथा जो महाभारतातील चक्रव्यूहमध्ये अडकला होता आणि पराभूत होऊनही अमर झाला.
सर्वात आधी आपण बोलू अभिमन्यूबद्दल. वेदव्यास रचित महाभारतातील एका कथेनुसार अभिमन्यू हा अर्जुन आणि श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा यांचा पूत्र होता. महाभारतात हाही उल्लेख आहे की अभिमन्यू पूर्वजन्मी चंद्रदेवाचा पूत्र होता. श्रीकृष्णाला हे माहिती होते की भविष्यात महाभारताचे युद्ध होणार आहे, आणि त्यांनी सर्व देवतांना आपले पुत्र पाठवण्याचे आवाहन केले होते. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून चंद्रदेव निराश झाले, पण श्रीकृष्णाचा मान ठेवण्यासाठी चंद्रदेवाने आपल्या पुत्राला पृथ्वीवर पाठवले. पण चंद्रदेवाचे म्हणणे असे होते की ते जास्त दिवस त्याच्या पुत्रापासून दूर राहणार नाही, आणि फार कमी काळासाठी ते मुलाला पृथ्वीवर पाठवतील. म्हणून अभिमन्यू अल्पायू होता, पृथ्वीवर त्याचे वय फक्त १६ वर्षांचे राहिले.
तुम्ही महाभारतात चक्रव्यूहचा उल्लेख ऐकला असेल, पण अनेकांना हे माहिती नाही की चक्रव्यूह नक्की काय होते? चक्रव्यूह एक बहुस्तरीय रक्षात्मक सैनिकांची रचना असते. याचा उपयोग एखाद्या मोठ्या योध्याला चारी बाजूंनी घेरण्यासाठी केला जातो. याला अतिशय कुशल युद्धकला मानले जाते. वरून पाहिले तर ही रचान एखाद्या चक्रासारखी किंवा पद्मासारखी दिसते. चक्रव्यूहच्या प्रत्येक प्रवेश मार्गाची रक्षा एक महायोद्धा करत असतो. महाभारतात याचा उपयोग कौरवांचे प्रमुख सेनापती द्रोणाचार्य यांनी धर्मराज युधिष्ठिरला बंदी बनवण्याच्या हेतूने केली होती. पण अभिमन्युचे साहस आणि पराक्रम पाहून त्याला या चक्रव्यूहमध्ये अडकवून मारण्यात आले.
जेव्हा अभिमन्यू जेव्हा सुभद्रेच्या गर्भात होता, तेव्हा अर्जुनाने सुभद्राला चक्रव्यूह भेदण्याची कला सांगितली होती. तेव्हा अभिमन्यू गर्भात ही कला ऐकत होता. जेव्हा अर्जुनाने चक्रव्यूहमधून बाहेर येण्याच्या कलेबद्दल सांगणे सुरू केले, तेव्हा सुभद्रा गाढ झोपेत होती, त्यामुळे गर्भात असलेला अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्याची पूर्ण कला ऐकू शकला नाही.
कुरुक्षेत्रात रणांगणावर जेव्हा युद्ध सुरू झाले, त्याच्या १३व्या दिवशी कौरवांनी पांडवांना अडकवण्याच्या उद्देशाने चक्रव्यूहची रचना केली होती. या चक्रव्यूहमधून बाहेर पडण्याची कला माहिती असणारे फक्त चार योद्धे होते ते म्हणजे श्रीकृष्ण, अर्जुन, गुरू द्रोणाचार्य आणि प्रद्युम्न. युद्धात धाडसी आणि पराक्रमी अभिमन्यूने चक्रव्यूहमध्ये प्रवेश केला आणि अत्यंत धाडसाने लढा दिला. महाभारतातील कथेनुसार अभिमन्यूने चक्रव्यूहचे ६ टप्पे पार केले, पण तो शेवटच्या टप्प्यात फसला, त्यानंतर कौरवांनी युद्धाचे नियम डावलत अभिमन्यूला घेरले.
महाभारतात अभिमन्यूचा वध हा अत्यंत भ्याड मानला जातो, कारण युद्धाचे नियम बाजूला सारत अभिमन्युची हत्या करण्यात आली होती. एका योद्ध्याला ७ जणांनी घेरून मारले होते. अभिमन्यूला द्रोणाचार्य, दुर्योधन, कर्ण, जयद्रथ, अश्वत्थामा, दुशासन, वृभसेन आणि इथर कौरवांनी मारले. अशा प्रकारे चक्रव्यूहमध्ये अडकवून महाभारतातील सर्वांत वीर योद्धा अभिमन्यू वयाच्या सोळाव्या वर्षी स्वर्गवासी झाला.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.