Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

BJP मधील वाद चव्हाट्यावर; दोन आमदारांमध्ये जुंपली, दिलं थेट आव्हान, वाचा नेमकं प्रकरण…

10

नवी मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच जुंपली आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईकांवर टिकास्त्र सोडले आहे. मागील २५ वर्षात मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि राज्यमंत्री अशी पदे उपभोगली आहेत. या सर्वांनी पाच शासकीय कामांसाठी आणलेला निधी, कामे दाखवा, एक लाख रुपये बक्षीस घ्या आणि कामे दाखवा मगच निवडणुकीला माझ्या समोर उभे रहा, असे आव्हान नाईकांना दिले आहे.
नव्या संसदेच्या लॉबीत पाण्याची गळती, काँग्रेस आक्रमक, बांधकामाची चौकशी करण्याची मागणी
आमदार म्हात्रे यांनी नागरी विकास कामांचा लेखा जोखा पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी डॉ.राजेश पाटील, समाजसेवक राजू तिकोने, पांडुरंग आमले, सुहासिनी नायडू, संजय ओबेरॉय, ज्योती पाटील आदी उपस्थित होते. ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक तर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आहेत. मागील वर्षभरापासून नाईकांनी आपला मोर्चा बेलापूरकडे वळविला आहे. मागील महिन्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी जनसंपर्क कार्यालय देखील याच मतदारसंघात सुरु केले आहे. तर बेलापूरमधून आमदारकी लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दोन्ही आमदारांमध्ये वादंग सुरु झाले आहे.आमदार म्हात्रे यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यासाठी कंबर खचली आहे. त्यामुळे जनतेचे आणि पक्षाचे वरिष्ठ स्तरावर आपल्यालाच सहकार्य मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपने दोन टर्म आमदारकीची संधी दिली. या कारकिर्दीत अनेक विकासकामे केली आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा विषय, जमीनी फ्री होल्ड करणे हा विषय माझा असताना आपण केलेल्या विकास कामांचे श्रेय मिळू नये, म्हणून गणेश नाईक यांनी नेहमीच खो घालत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.

सीबीडी उड्डाणपूल, मरिना प्रकल्प आणि शासकीय रुग्णालयाचे काम लटकवून ठेवले आहे. सत्तेत असताना प्रकल्पग्रस्तांसाठी यांना काहीच करता आले नाही,असा घणाघात आमदार म्हात्रे यांनी केला आहे. दोन वर्ष भाजप आमदार म्हणून नवी मुंबईत पक्ष संघटन मजबूत केले आहे. मात्र वर्षभरात नाईक पिता पुत्रांनी संघटना खिळखीळी केली असल्याचा गंभीर आरोप आमदार म्हात्रे यांनी केला आहे. भाजप आमदारांमधील वाद मिटविण्यासाठी पक्षक्षेष्ठी कधी लक्ष घालणार की, ऐन निवडणुकीत नवे बदल दिसणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.