Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उरण प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, पण…; दाऊदनं कबुलीत नेमकं काय काय सांगितलं?

7

नवी मुंबई: उरणमधील तरुणीच्या हत्या प्रकरणात दररोज नवी माहिती उघड होत आहे. गेल्या आठवड्यात तरुणीचा मृतदेह उरण रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या झुडूपात आढळून आला. त्यानंतर पाच दिवसांनी पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला कर्नाटकच्या गुलबर्गामधून अटक केली. आता त्याची चौकशी सुरु आहे. शेखला न्यायालयानं सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून नव्या माहितीचा उलगडा होत आहे.

तरुणीच्या हत्येसाठी आरोपी दाऊद शेखनं धारदार कोयत्याचा वापर केला होता. पोलीस तपासातून ही बाब उघड झाली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर त्यानं तिचा मोबाईल उरण-बेलापूर दरम्यान फेकून दिला. तशी कबुली आरोपीनं पोलिसांना दिली आहे. निर्जन ठिकाणी तरुणीला गाठून शेखनं तिची हत्या केली. त्यानंतर त्यानं घटनास्थळावरुन पळ काढत जवळच असलेलं उरण स्थानक गाठलं.
Navi Mumbai Murder: उरणमध्ये तरुणीला संपवल्यानंतर दाऊद फरार; अटक टाळण्यासाठी कर्नाटकात दररोज भलताच उपद्व्याप
आरोपी दाऊद शेखनं हत्येसाठी वापरलेला धारदार कोयता आणि तरुणीचा मोबाईल रेल्वे प्रवासादरम्यान फेकून दिला. तशी कबुली शेखनं पोलिसांकडे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या भागात शोध घेतला. तेव्हा त्यांच्या हाती कोयता लागला. पण तरुणीचा मोबाईल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपी सातत्यानं तरुणीशी फोनवरुन संवाद साधायचा. त्यानं फोटोंच्या मदतीनं तिला ब्लॅकमेल केलं होतं. त्यामुळे तरुणीचा मोबाईल या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा आहे.
Navi Mumbai Murder: तरुणीचा मोबाईल गेला कुठे? पोलिसांना वेगळीच शंका; उरण प्रकरणाला नवं वळण?
तरुणीच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यारं आणि तिचा मोबाईल या संपूर्ण प्रकरणातील दोन महत्त्वाचे पुरावे आहेत. यातील एक पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला आहे. पण मृत तरुणीचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही. हत्या केल्यानंतर आरोपीनं तिचा मोबाईल फॉरमॅट केला असावा, अशी शंका पोलिसांना आहे. तरुणीचा मोबाईल नेमका गेला कुठे, असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे.

आरोपी दाऊद शेख त्याच्याकडे असलेल्या फोटोंच्या आधारे तरुणीला ब्लॅकमेल करायचा. त्याच्याकडे तरुणीचे काही आक्षेपार्ह फोटो होते. ते त्यानं तरुणीला पाठवले आणि तिला ब्लॅकमेल केलं. तिच्याकडे भेटीसाठी तगादा लावला. पण तरुणी त्याला भेटण्यास तयार नव्हती. त्यामुळे त्यानं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर तरुणी त्याला भेटण्यास तयार झाली. भेटल्यावर फोटो सोशल मीडियावरुन डिलीट करेन, अशी तयारी दाऊदनं दाखवली. त्यामुळे तरुणी दाऊदला भेटण्यास तयार झाली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.