Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आरोपी बापाला भेटण्यास लेकराला नकार, पोटच्या पोराचं टोकाचं पाऊल; दृश्य बघून अधिकारी हादरले

9

निलेश पाटील, जळगाव : वाघाच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वडिलांना भेटून दिल्याने अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हलखेडा तालुका मुक्ताईनगर येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. सोम रहीम पवार (वय १४) असं या आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. आत्महत्यापूर्वी त्याने चार ओळींची सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. त्यावरही तसाच उल्लेख केला आहे.जळगावजवळ वाघाची कातडी जप्त करण्यात आल्याची घटना २७ जुलै रोजी घडली होती यात सहा जणांना वनविभागाने अटक केली होती. यात सोम याचे वडील रहीम रफिक पवार (वय ४०) आणि आई तेवाबाई पवार (वय ३५, रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) यांचाही समावेश होता. या गुन्हाच्या तपासा कामे वनविभागाचे पथक संशयित रहीम याला घेऊन शुक्रवारी सकाळी हलखेडा येथे आले होते. त्यावेळी आपणास वडिलांना भेटू द्यावे, अशी मागणी सोम याने केली. मात्र, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला भेटू दिले नाही.
Sanjay Raut : देशमुखांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने तुरुंगातून प्रवक्ता आणला, राऊतांची शेलकी टीका

यानंतर काही वेळाने सोम याने घराशेजारीच असलेल्या पोल्ट्री फार्मसाठी उभ्या केलेल्या शेडमध्ये गळफास घेतला. हा प्रकार त्याच्या लहान बहिणीच्या लक्षात आला. यावर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. सोम यांच्या मृत्यू वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमची आत्या नरेशना गांधी भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन

जोपर्यंत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी येत नाहीत. तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका सोमचे नातेवाईक आणि गावातील लोकांनी घेतली. कुराचौकीच्या पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आम्ही इन कॅमेरा तपासणी केली. संशयिताच्या परिवारासोबत कर्मचाऱ्यांनी गैरप्रकार केलेला नाही, असं वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे यांनी स्पष्ट केलं आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.