
Tej Police Times
आज महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ मुंबईतील षणमुखानंद सभागृहात वाढवण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी पहिलं भाषण करत महायुती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि मोदी-शाहांना खडसावलं. मुंबईला संपवायला निघाल तर मुंबई तुमचं काय करेल ते निवडणुकीत कळेलच असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबईची अवस्था काय करुन ठेवली आहे ते बघा, मुंबईत बेसुमार जे काही खोदकाम चाललं आहे मेट्रोचं. दुसरं इमारती. मग बातम्या येतात की धरणं भरली तरी मुंबईकरांची तहाण का भागत नाही, कारण तुम्ही सगळं खोदून ठेवलं आहे. काही ठिकाणी गटाराचं पाणी पिण्याच्या पाण्यात मिक्स होत आहे, अनेक मुंबईकरांना पोटाचे विकार होत आहेत, जबाबदार कोण याला, असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
मुंबईला यांनी कधी शहर म्हणून पाहिलं नाही. मुंबईकरांना कधी आपलं मानलंच नाही. सोन्याचं अंडं देणारी ही कोंबडी म्हणून जर का नरेंद्र मोदी आणि अमित शहा पाहत असतील, तर स्वत: शाकाहारी असले तरी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी जर तुम्ही कापणार असाल, तर मुंबईकर तुमची काय हालत करेल हे पुढच्या निवडणुकीत कळेलच. येत्या निवडणुकीत मुंबईकर काय करतात दिसेलच, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.
तसेच, यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही विधान केलं. ‘युतीत बसून काड्या करणारे खूप आहेत. सारखे विचारत असतात,
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का? माझं पृथ्वीराज बाबा किंवा शरद पवार यांना सांगणं आहे, की मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा असेल. आताच्या आता जाहीर करा, पाठिंबा देतो की नाही ते पहा’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना उत्तर दिलं.
Recover your password.
A password will be e-mailed to you.