तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

आचरा समुद्रात मासेमारीसाठी गेले, अचानक बोटीत पाणी शिरलं आणि…नारळी पोर्णिमेच्या दिवशी गावावर शोककळा

0 31

अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील मालवण आचरा या परिसरामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या बोटीतून तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तळकोकणामध्ये १ ऑगस्ट पासून मासेमारीला सुरुवात होते. त्याच अनुषंगाने नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी बोट घेऊन हे तिघेजण गेले होते. मात्र ही धक्कादायक घटना ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली पात नौका आचरा नजीकच्या समुद्रात दुर्घटना ग्रस्त झाली. या दुर्घटनेत नौकेतील चारही मच्छिमारांनी नौकेतून समुद्रात उडी घेतल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर एकाने पोहत येऊन पहाटे आचरा किनारा गाठल्याने त्याचे प्राण वाचले. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये नौकामालक आणि सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन, सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम उर्फ जीजी आडकर यांच्यासह खलाशी प्रसाद भरत सुर्वे (वय ३२), लक्ष्मण शिवाजी सुर्वे (वय ६५) यांचा समावेश आहे. तर विजय अनंत धुरत (वय ५३, रा. मोर्वे देवगड) यांनी किनारा गाठण्यात यश मिळवल्याने ते बचावले आहेत.
Chhatrapati Sambhajinagar : शेतातून मोठा आवाज आला आणि… शेंगा तोडण्यासाठी गेलेल्या मायलेकीवर काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेकोट येथील गंगाराम उर्फ जीजी आडकर हे काल रविवारी रात्री आपली जनता जनार्दन या नावाची मच्छीमारी पात नौका घेऊन तीन खलाशांना घेऊन समुद्रात मासेमारीला गेले होते. कुणकेश्वर येथील समुद्रात मासेमारी करून जाळी ओढल्यावर ते माघारी परत असताना मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास धुक्यामुळे नौका हेलकावे घेऊन पाणी भरू लागल्याने जीव वाचवण्यासाठी चौघांनीही समुद्रात उड्या घेतल्या. सोमवारी पहाटे यातील विजय धुरत हे आचरा बंदर नजीकच्या समुद्रातून पोहत येताना दिसून आले. तर अन्य तिघे मच्छिमार बेपत्ता होते.

सोमवारी सकाळी हिर्लेवाडी आणि वायंगणी किनाऱ्यावर तिन्ही बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह सापडून आले. हे मृतदेह आचरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रावर ती गावकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती, तर पोहत आलेल्या विजय धुरत यांच्यावर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. यावेळी आचरा पोलीस निरीक्षक पी. ए. पोवार, हवालदार तांबे, हवालदार पुजारे, हवालदार परब, काँस्टेबल वैजल आदी उपस्थित होते. यावेळी डीवायएसपी आणि मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनीही भेट देत पाहणी केली.या दुर्घटनेमुळे ऐन रक्षाबंधना दिवशी सर्जेकोट गावावर शोककळा पसरली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.