Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बदलापुरनंतर आता पुण्यात संतापजनक प्रकार; नामांकित शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

8

पुणे (आदित्य भवार): कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येनंतर आता ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेतील दोन चिमुकलींवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. या घटनेला सात दिवस झाल्यानंतर ही कोणतीही कारवाई न झाल्याने हजारो लोकांचा जमाव रेल्वे स्थानकावर आंदोलन करत आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बदलापूर येथील घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया समोर येत असताना पुण्यातील एका नामांकित शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळाल्या माहितीनुसार, भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १५ ऑगस्टच्या दिवशी घडली. पीडित मुलगी ही सातवीच्या वर्गात शिकत आहे. तर अत्याचार करणारा आरोपी हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. आरोपी विद्यार्थ्याचे वय १९ असून त्याचे नाव देवराज पदम आग्री असे आहे.
Raj Thackeray : संताप आणणारा प्रकार, गुन्हा दाखल करुन घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले? राज ठाकरेंचा सवाल

या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. १५ ऑगस्ट रोजी शाळेतील स्वच्छतागृहाजवळ हा प्रकार घडला. समर्थ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध ७४,७५ (१) (i) पोक्सो ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापुरात ८ तासापासून रेल्वे रोको

बदलापूर येथील एका शाळेत १२ आणि १३ ऑगस्ट रोजी आरोपी अक्षय शिंदे याने दोन चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अत्याचार केले. या घटनेबाबत ठाकरे गटाचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी सोशळ मीडियावर पोस्ट केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. हा प्रकार पालक आणि नागरिकांना कळताच त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरू केले. संतप्त झालेल्या जमावाने शाळेची तोडफोड केली. त्यानंतर हजारोच्या संख्यने लोकांनी रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू केले. गेल्या ८ तासापासून आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलकांनी रेल्वे रोको सुरु केले आहे. पोलीस आणि राज्य सरकारने तातडीने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर देखील आंदोलन मागे घेण्यात आले नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.