
Tej Police Times
सातारा, कोल्हापूर, बदलापूर, दौंड, अकोला अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत आणि गुन्हेगारीकरण वाढत आहे. यामुळे महिला या राज्यात सुरक्षित नाहीत. दीड हजार रुपयांच्या लाडकी बहीण योजनेपेक्षा त्या महिलांना सुरक्षित करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आता लोकच म्हणू लागले आहेत, हे दीड हजार रुपये परत घ्या परंतु आमच्या लेकीबाळी सुरक्षित असल्या पाहिजेत, यावरूनच सुरक्षेचे महत्त्व सरकारला कळाले पाहिजे अर्थात मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट उशिरा लक्षात आली असे म्हणावे लागेल, असेही सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाल्या. दरम्यान, बदलापूर प्रकरणानंतर राज्यातील कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी होत आहे. बदलापूर प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची मागणी होत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.