
Tej Police Times
दोघेही विजयनगर येथील रामभूमी सोसायटीत राहत होते. आरोपी बाबुलाल हा माथाडी कामगार असून त्याला दारूचे व्यसन होते. आणि आरोपी बाबुलाल हा आपल्या पत्नीवर संशय ही घेत असल्याचे सांगण्याय येत आहे. तसेच बाबुलाल आणि सबिरा यांचा लग्नाला 10 वर्षे झाली होती. लग्नाला इतके वर्ष होऊनही सबिराला मूल झाले नव्हते. यावरून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. नेहमी होत असलेल्या भांडणामुळे सबीरा ही घर सोडून माहेरी गेली होती. त्यानंतर काही दिवसानंतर ती परत आली. मंगळवारी रात्री आरोपी बाबुलाल हा दारू पिऊन घरी आला होता. त्यानंतर याच मुद्द्यावरून त्यांच्यात भांडण झाले, त्यात बाबुलालने सबीरा हिच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून तिला गंभीर जखमी केले, त्यातच सबिरा हिचा मृत्यू झाला.
Maharashtra Politics: एवढ्या मोठ्या नेत्याला अशी विधाने करणे शोभत नाही; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
दरम्यान मृतक महिलेचा भाचा महिलेला अनेक वेळा फोन करत होतो. मात्र मावशी फोन उचलत नसल्याने त्याने तिचा पती बाबुलाल याला फोन केला. त्यावेळी बाबुलाल यांनी त्याची मावशी सबिराची हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेचा भाचा महिलेचा घरी गेला असता त्यांचे घराचे दार बंद होते. महिलेच्या भाच्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ पोहोचली असता घराचा दार बंद होता.
कौतुकास्पद! पतीची प्रेरणा घेऊन पत्नीचा अभिमानास्पद निर्णय, गावकऱ्यांनी वाजत गाजत काढली मिरवणूक
पोलिसांनी दार थोठावल्या नंतर आरोपीने दार उघडले आणि लग्नाला 10 वर्ष झाले असूनही माझ्या पत्नीला मुलं बाळ झाले नाही म्हणून मी माझ्या पत्नीची हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर कळमना पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आणि आरोपी बाबूलाल याला घटनास्थळावरून अटक केली असून पुढील तपास करत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.