
Tej Police Times
अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेले काही दिवस गुजरातमध्ये अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता हे क्षेत्र नैऋत्येकडे सरकून अरबी समुद्रात प्रवेश करणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, उत्तर अरबी समुद्रावर शुक्रवारी चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता असून, एक सप्टेंबरपर्यंत हे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत राहील. ओमन किनाऱ्याजवळ पोचल्यावर त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा प्रवाह सक्रिय असल्याने समुद्राचे तापमान आणि वाऱ्यांची स्थिती चक्रीवादळांसाठी पोषक नसते. मात्र, अपवादात्मक स्थितीत ऑगस्ट महिन्यात या आधीही चक्रीवादळे तयार झाली आहेत. सन १८९१ ते २०२३ या १३२ वर्षांच्या कालावधीत ऑगस्ट महिन्यात बंगालच्या उपसागरावर २८ ; तर अरबी समुद्रात फक्त तीन (१९४४, १९६४, १९७६) चक्रीवादळे तयार झाली.
Vasai Virar News: वसईतील किनाऱ्यावर बोटी पुन्हा विसावल्या; वादळी वाऱ्यामुळे मासेमारी पुन्हा बंद
असना चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीपासून दूर जाणार असल्याने त्याचा महाराष्ट्रावर विशेष प्रभाव पडणार नाही असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, मध्य बंगालच्या उपसागरावर गुरुवारी तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या तीन सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत बंगालच्या उपसागरतील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल. हे डिप्रेशन ओडिशा आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता असून, त्याच्या प्रभावामुळे ३१ ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला विदर्भासाठी; तर दोन तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.