Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची तडकफडकी बदली, नवे कलेक्टर…

6

New District Collector Of Sindhudurg : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशात चर्चे आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
म. टा. विशेष प्रतिनिधी

मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना राज्य सरकारने सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली केली. तावडे यांच्या जागी हाफकिन बायो फार्मा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या आदेशात किशोर तावडे यांचा समावेश आहे. तावडे यांची बदली महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली आहे. तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या एस. जी. कोलते यांची नियुक्ती भंडारा जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

राजकोट किल्ला परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २७ ऑगस्ट रोजी कोसळला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. हे प्रकरण इतके तापले की, अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागावी लागली होती. त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली होती.
प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल; म्हणाले होते, कोणी मस्ती केली तर किड्या-मकोड्यासारखे मारू

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मालवण येथे राणे समर्थक आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात तुफान राडा झाला होता. ज्यात आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे काही कार्यकर्ते तसेच खासदार नारायण राणे आणि निलेश राणे व त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी ४२ जणांवर तर १५० दीडशे अनोळखी कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती.
त्यांना बोलू द्यात..त्याने अंगाला भोके पडत नाहीत; अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर जळजळीत टीका

या घटनेनंतर त्याची जबाबदारी कोणाची होती यावरून देखील वाद रंगला होता. राज्य सरकारने हा पुतळा नौदलाने बांधला होता असा दावा केला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०२३ मध्ये केले होते. त्यानंतर अवघ्या ८ महिन्यात हा पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्यानंतर काही वादग्रस्त वक्तव्य देखील झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरे झाले, त्यामधून काही चांगले होईल, असे वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले होते ज्यावर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला होता.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.