
Tej Police Times
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी गावात पवन गोपाल सुर्यवंशी आपल्या आई वडीलांसह वास्तव्याला होता. सध्या विटनेर येथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता, त्याचे आईवडील शेती करून उदरनिर्वाह करतात. पोळा निमित्त त्याने बैलांना सजवण्याची तयारी सुरू होते. त्यामुळे पवन सुर्यवंशी बैलांसाठी कासरा आणि गोंडे घेण्यासाठी गावातील अल्ताफ तडवी यांच्यासोबत सोमवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी दुचाकीने वावडदा येथे गेले.
बैलांसाठी नवीन सामान खरेदी केल्यानंतर सकाळी १० वाजता परत येत असतांना वाडवदा ते जळके रस्त्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पवन सुर्यवंशी याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर अल्ताफ थोडक्यात बचावला आहे. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक वाहन घेवून पसार झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांसह मित्रपरिवार यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याने आई वडीलांनी प्रचंड आक्रोश केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई रूपाला, वडील गोपाल त्र्यंबक सुर्यवंशी आणि तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. घटनेमुळे वसंतवाडी गावात शोककळा पसरली आहे.
लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.