तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल; म्हणाले होते, कोणी मस्ती केली तर किड्या-मकोड्यासारखे मारू

0 74

Nitesh Rane: अहमदनगर रविवारी सकल हिंदू समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
अहमदनगर (विजयसिंह होलम) : मुस्लिम समाजाविरोधात प्रक्षोभक भाषण करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याविरूद्ध नगरच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाला धमकवल्याचा, धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोर्चा संपल्यानंतर रविवारी रात्री मुस्लिम कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा झाले. राणे यांच्याविरूद्ध आक्रमक झालेल्या या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन राणेंविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते असिफ चांदसहाब शेख यांनी फिर्याद दिली आहे.

महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांग्लादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रविवारी नगरमध्ये सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. यासाठी राणे नगरला आले होते. मोर्चाचा समारोप दिल्ली गेट येथे झाले. त्यावेळी राणे यांचे आक्रमक भाषण झाले. आपण हिंदूंचे गब्बर असल्याचेही ते म्हणाले. राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखवणारे भाषण केल्याची फिर्याद शेख यांनी दिली. त्यानुसार राणे आणि मोर्चाचे संयोजक दिगंबर गेंट्याल यांच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जातीनिहाय जनगणनेवर RSSचे मोठे वक्तव्य; संवेदनशील मुद्दा, निवडणुकीतील उद्देशांसाठी त्याचा वापर नको

सिन्नर येथील प्रवचनात नगर जिल्ह्यातील सराला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले. त्यावरून मुस्लिम समाजाने त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढले. त्यानंतर आता हिंदूंतर्फे ठिकठिकाणी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत. असाच मोर्चा रविवारी नगरला निघाला होता. समारोपप्रसंगी आमदार राणे यांनी केलेल्या भाषणावर मुस्लिम समाजाचा आक्षेप आहे. राणे यांचे भाषण मुस्लिम समाजाला धमकावणारे, धार्मिक भावना दुखवणारे आणि तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी नितेश राणेंविरूद्ध गुन्हा दाखल; म्हणाले होते, कोणी मस्ती केली तर किड्या-मकोड्यासारखे मारू

काय म्हणाले होते राणे

मंहत रामगिरी महाराज यांना पाठिंबा दर्शविताना राणे म्हणाले होते की,एवढ्या संख्येने बाहेर येऊ की किड्या-मकोड्यासारखे मारू. हा देश हिंदुंचा आहे आणि येथे फक्त भगवंतांचे चालेल बाकी कोणाचे नाही. कोणी मस्ती केली तर चून-चून के मारेंगे.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.