
Tej Police Times
नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठी कॉन्क्लेव्हला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी महायुती, अजित पवार, विधानसभा निवडणुका अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. अजित पवार यांच्यासोबत युती करुन चूक केली का? असा सवालही त्यांना या कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत ही काळाची गरज होती असं म्हणत इतरही अनेक मुद्दे मांडले.
‘अजित पवारांना सोबत घेऊन चूक झाली हे असं म्हणणार नाही, काळाची गरज होती, त्यामुळे काळाची गरज असताना संधी आली, तर सोडायची नसते’, असं ते म्हणाले. अजित दादांना महायुतीतून वगळणार नाही, लोकसभेप्रमाणेच आम्ही विधानसभेला एकत्र आहोत. अजित पवार ४० वर्ष राजकारणात आहेत. ते आमदारांना घेऊन सिद्धीविनायकाला गेले. त्यांना असं कधी पाहिलं होतं का? पण आता ते गेले. त्यांना काही गुण आमचे लागणार. त्यामुळे काळजी करू नका, स्थिर – स्थावर होण्यासाठी वेळ लागतो, त्याचा फायदा होईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दादांची कोणतीही एक्झिट नाही, आम्ही सर्व लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठी एकत्र राहणार असून मित्र पक्षही सोबत असणार आहेत. आता लवकरच तीन पक्षांचे अधिकृत प्रवक्ते जाहीर करण्यात येणार आहेत. ते बोलतील तेच अधिकृत असेल, अशी प्रतिक्रियाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.