Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mumbai : अंबरनाथ हादरलं! ६ वर्षीय मुलीचा २३ वर्षीय नराधमाकडून विनयभंग

9

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 8 Sept 2024, 10:10 pm

ambernath girl case : अंबरनाथमध्ये एका ६ वर्षीय चिमुकलीचा २३ वर्षीय नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : बदलापूरमधील चिमुकलीवर झालेली अत्याचाराची घटना ताजी असतानाच अंबरनाथ मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ६ वर्षीय चिमुकलीचा २३ वर्षीय नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं आहे.

आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

अंबरनाथमधील शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित मुलगी शनिवारी सायंकाळच्या सुमारास एकटी जात होती. याचाच फायदा आरोपीने घेतला. आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. नंतर मुलगी रडू लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांचे तिच्याकडे लक्ष गेले. आणि तिच्याकडे धाव घेतली. आरोपीला प्रथम नगरिकांनी जोरदार चोप दिला. नंतर पोलिसांच्या हवाली केलं. यावर शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अतिशय कडक शिक्षा व्हावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Thane Crime News: अजितदादा गटाच्या जिल्हाध्यक्षांची भररस्त्यात हाणामारी; तरुणावर हल्ला, गु्न्हा दाखल

बदलापूरमध्येही घडली घटना

बदलापूरमध्ये एका शाळेतील शिपायाने 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद राज्यासह संपूर्ण देशभरात उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईमध्ये लोकांकडून रेल रोको आंदोलन देखील करण्यात आलं होतं. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्यासंदर्भात उच्च न्यायलयात केस सुरू आहे. अक्षय शिंदे असे आरोपीचे नाव असून त्याने चिमूकलीवर अत्याचार केले आहेत.बदलापूरच्या घटनेनंतर देखील राज्यातील विविध जिल्ह्यांमधून अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेमुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, बदलापूर घटनेवरून विरोधकांनी देखील राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता आरोपी अक्षय शिंदे याला उच्च न्यायालय काय शिक्षा देतयं याकडे सर्वाचेच लक्ष असणार आहे.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.