
Tej Police Times
काहीजण असे म्हणतात की, चपाती / पोळी मोजून बनवली तर वाया जात नाही आणि अन्न हे पुर्णब्रह्म असल्यामुळे ते वाया घालवू नये. हे बरोबर आहे पण तरीही चपाती / पोळी मोजून बनवू नये. समजा तुम्ही मोजून चपाती / पोळीचे कणीक तयार केले आणि ते बाकी राहिले तर काय करणार ते फ्रिजमध्ये ठेवणार आणि फ्रिजमध्ये ठेवलेले कणीक पुन्हा वापरणे अयोग्य आहे कारण त्यात बैक्टीरिया वाढतात. असे कणीक वापरून तयार चपाती / पोळी खाल्ली तर कुटुंबाच्या आरोग्याला हानी पोहचू शकते त्यामुळे शास्त्रीय दृष्टीकोनातूनही चपाती / पोळी मोजून खाणे योग्य नाही.
याशिवाय, धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर चपाती / पोळीचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहाशी आहे. तसेच, राहिलेल्या कणकेचा संबंध राहूशी आहे. चपाती / पोळी मोजून बनवल्याने केवळ मंगळ आणि सूर्य ग्रह कमजोर होतात असे नाही, तर राहूचा दुष्परिणाम देखील जीवनावर पडतो. म्हणूनच चपाती / पोळी मोजून बनवून नये असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे.
चपाती / पोळी बनवताना कुटुंबातील सदस्यांना विचारणे किती पोळ्या खाणार किंवा पोळी खाताना त्या मोजेणे ही अत्यंत वाईट सवय आहे. चपाती / पोळी बनविताना दोन जास्त तयार करा. कारण अचानक घरात पाहुणे आले किंवा दरवाज्यावर कोणी गरजवंत आला तर तो उपाशी राहणार नाही. तुम्ही भुकलेल्या व्यक्तीला अन्न दिले, त्याची भूक शांत केली तर त्याचे अपार पुण्य मिळते. माता अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि सूर्य, मंगळ, राहू, शनी आणि इतर ग्रहांची कृपादृष्टी राहते.
हिंदुधर्मानुसार पहिली चपाती / पोळी गायीसाठी आणि शेवटची श्वानासाठी किंवा इतर कोणत्याही पशूंसाठी तयार केली जाते. या चपाती / पोळीमध्ये गूळ किंवा साखर घालून प्राण्यांना दिली तर माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
चपाती / पोळी बनवण्यासाठी जी शेगडी वापरली जाते तिची दिशा आग्नेय म्हणजे दक्षिण-पूर्व दिशेला असावी. जी व्यक्ती चपाती / पोळी बनवते आहे, तिचे मुख पूर्व दिशेला असावे. यामुळे कुटुंबाला अधिक लाभ मिळतो.
शास्त्रानुसार एकादशीला भात खाणे वर्ज्य मानले जाते, त्यामुळे तांदुळाची भाकरी खावू नये. शरद पौर्णिमा, शीतलाष्टमी, नागपंचमी आणि कुणाच्या मृत्यूनंतर घरात पोळी किंवा भाकरी तयार केली जात नाही. कुणाच्या मृत्यूनंतर जर घरात पोळी किंवा भाकरी बनवली गेली, तर त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते आणि मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही असे सांगितले जाते.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.