
Tej Police Times
पितृपंधरवड्यात श्राद्ध आणि तर्पण केलं जातं. आपल्या पूर्वजांची आठवण तसेच त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर कायम राहावी म्हणून दानधर्म केला जातो. या काळात एक वस्तू फार महत्त्वाची असते. ती वस्तू कोणती त्याबद्दल अधिक जाणून घेवूया या लेखात.
श्राद्धकर्म करताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय श्राद्धकर्म केले तर त्याचा स्विकार होत नाही, असे पुराणात सांगितलेले आहे. पितृपक्षात काळे तीळ आणि दर्भ यांचे महत्त्व सर्वाधिक मानले जाते. अशी मान्यता आहे की पितृ तर्पणात या दोन गोष्टींचा वापर आवश्यक आहे. काळे तीळ आणि दर्भाशिवाय दिलेले पाणी पितरांपर्यंत पोहोचत नाही.
बारा पुराणांच्या 13व्या अध्यायात सांगितले आहे, ‘स्वतः पितरांनीच असे म्हटले आहे की, जो मनुष्य श्राद्धात ब्राह्मण किंवा गरीबाला भोजन देऊ शकत नाही, तो आपल्या पूर्वजांचे स्मरण करून एक मूठ काळे तीळ दान करेल, तर त्याच्या पितरांना समाधान मिळेल.’ याशिवाय तुम्ही एक उपाय असा ही करु शकता की, पितृपक्षात स्नान केल्यानंतर तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात सात काळे तीळ टाकावेत आणि पितरांचे स्मरण करत दर्भ असणाऱ्या हाताद्वारे जल अर्पण करावे, असे केल्यास पितरांना आनंद मिळतो. तसेच ते संततीला आशिर्वाद देतात.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.