
Tej Police Times
वास्तुनुसार नवरात्रीमध्ये कलश स्थापना अधिक महत्त्वाचे आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी कलश नेहमी ईशान्य दिशेला ठेवायला हवा. ही दिशा भगवान शंकराची मानली गेली आहे. यामुळे घरात समृद्धी टिकून राहाते. जर तुम्हाला ईशान्य दिशेला कलश ठेवता येत नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला कलश स्थापना करु शकता. दक्षिण दिशेला कलश ठेवणे टाळावे.
वास्तुशास्त्रानुसार कलश स्थापना करताना त्याचा शुभ मुहूर्त पाहा. ज्यामुळे तुम्हाला लाभ होतील. कलश स्थापना ही सकाळी केली जाते. कलश स्थापना करण्यापूर्वी ती जागा पूर्णपणे स्वच्छ करा. नवरात्रीच्या पहिल्या माळेला अर्थात प्रतिपदा तिथीला कलश स्थापना करणे अंत्यत शुभ मानले जाते.
नवरात्रीच्या विधीसाठी कलश हा नेहमी तांब्याचा किंवा पितळेचा असावा. या धातूंना हिंदू धर्मात पवित्र मानले गेले आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहाते. कलश स्थापित करण्यासाठी प्लास्टिक, लोखंड किंवा कृत्रिम साहित्याचा वापर करु नका. तसेच कलशावर आंब्याची डहाळे, सुपारी, देठाची पाने, नारळ, लाल कापड आणि नाडाबंडल बांधून कलश स्थापना करा.
वास्तुशास्त्रानुसार कलश स्थापना करण्यापूर्वी त्यावर स्वस्तिक चिन्ह असायला हवे. स्वस्तिक हे पवित्र प्रतीक मानले जाते. तसेच समृद्धी, कल्याण आणि जीवनाच्या शाश्वत चक्राचे प्रतीक आहे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो.
लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.