Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Ratan Tata : रतन टाटा यांचा अंतिम संस्कार कसा होणार? पारसी धर्मात अंतिम संस्काराचे नियम काय? जाणून घ्या

10

Ratan Tata Funeral: उद्योगपती रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे त्यांना रुग्णालयता दाखल करण्यात आले होते. रतन टाटा यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोकाकूल झालेला आहे. रतन टाटा हे पारसी होते, त्यांच्यावर वरळी स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत. पारसी समुदायात अंतिम संस्कार करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. हिंदू किंवा मुस्लिम धर्मात मृतदेहाला अग्नि दिला जातो किंवा दफन केले जाते, पण पारसी लोकांमध्ये अंत्यसंस्काराची प्रथा फारच वेगळी आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Parsi community Funeral Rituals:

प्रत्येक धर्मात अंतिम संस्काराची एक खास प्रथा असते, त्याचप्रमाणे पारसी समाजात अंतिम संस्काराची एक वेगळी प्रथा आहे. पारसी लोकांमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तिला अग्नि दिला जात नाही किंवा तिला दफन केले जात नाही. तो मृतदेह ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ येथे ठेवला जातो.

काय आहे टॉवर ऑफ सायलेन्स?

टॉवर ऑफ सायलेन्स याला दखमा असेही म्हणतात. ही गोलाकार जागा असते. जी प्रशस्त असून तिथे भरपूर सूर्यप्रकाश येत असतो. येथे सूर्याच्या किरणांखाली मृतदेह ठेवला जातो. त्यानंतर गिधाडं येवून तो मृतदेह खातात. गिधाडांचे मृतदेह खाणे हे पारसी समुदायाच्या रीतिरिवाजांचा एक भाग आहे. अंतिम संस्काराच्या या प्रक्रियेस ‘दोखमेनाशिनी’ असे म्हणतात. पारसी धर्मात मृतदेहाला सूर्याच्या किरणांमध्ये ठेवले जाते. त्यानंतर गिधाड, घार आणि कावळे तो मृतदेह खाऊन टाकतात. पारसी धर्मात मृतदेह जाळणे किंवा पुरणे हे निसर्गाला प्रदूषित करण्यासारखे असे मानतात त्यामुळे हजारो वर्षांपासून या पद्धतीत अंतिम संस्कार केले जातात.

पारसी धर्मात मृत शरीराला अशुद्ध मानतात

पारसी धर्मात मृत शरीराला अशुद्ध मानले जाते असे म्हणतात. मृतदेहाला खुल्या आसमानाखाली सोडणे यामागे पारसी धर्मात एक महत्त्वाचे कारण सांगितले जाते. पारसी समाजानुसार तर मृतदेह जाळला तर अग्नि तत्त्व अशुद्ध होते आणि मृतदेह पुरला तर धरणी प्रदुषीत होते. मृतदेह पाण्यात सोडला तर जल तत्त्व खराब होवू शकते. पारसी लोक पर्यावरण प्रेमी आहेत, त्यामुळे ते कोणत्याही बाबतीत पर्यावरणाला हानी पोहचू देत नाहीत. पारसी धर्मात पृथ्वी, जल आणि अग्नी तत्वांना अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे परंपरावादी पारसी लोकांच्या मते मृतदेह जाळून अंतिम संस्कार करणे धार्मिक दृष्टिकोनातून योग्य नाही.

रतन टाटा यांचा अंतिम संस्कार विधी

रतन टाटा यांचा अंतिम संस्कार वरळी येथील इलेक्ट्रीक स्मशानभूमीत होणार आहे. दरम्यान एका प्रार्थना हॉलमध्ये त्यांचे पार्थिव ठेवले जाईल. तिथे 45 मिनिटे प्रार्थना केली जाईल. पारसी पद्धतीने ‘गेह-सारनू’ वाचले जाईल. त्यानंतर रतन टाटा यांच्या चेहऱ्यावर एका कापडाचा तुकडा ठेवून ‘अहनावेती’चा पहिल्या अध्यायाचे वाचन होईल. ही प्रार्थना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव इलेक्ट्रिकअग्निदाहात ठेवले जाईल आणि अंतिम संस्काराची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

टीप : ही सर्व माहिती सामान्य आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.