Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नितेश राणे स्वत:च्या भावाला पक्षात ठेवून न्याय देऊ शकले नाहीत; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा जोरदार निशाणा

5

Maharashtra Election 2024 : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कणकवली मतदारसंघाचे उमेदवार संदेश पारकर यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राणे यांच्यामुळे भाजपची वाढ खुंटली असा आरोप पारकर यांनी केला.

Lipi

सिंधुदुर्ग (अनंत पाताडे) : कणकवली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात राजकारण मात्र हळूहळू ढवळू लागला आहे. कालच उमेदवारी जाहीर झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नितेश राणे यांच्यावरती जोरदार निशाणा साधला आहे. अनेक आरोप देखील आमदार नितेश राणे यांच्यावर संदेश पारकर यांनी केले आहेत. नारायण राणेंचे कडवे विरोधक म्हणून संदेश पारकर यांच्याकडे पाहिले जाते.

संदेश परकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पारकर यांनी राणेंवर जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणे स्वतःच्या भावाला आपल्या पक्षात न्याय देवू शकले नाहीत,ते कार्यकर्त्यांचे प्रवेश घेवून काय करणार? त्यांनी आत्मपरीक्षण करावे? आपला भाऊ भाजप सोडून का गेला? याचे आत्मचिंतन नितेश राणे यांनी करावे असे वक्तव्य संदेश परकर यांनी केले आहे. नितेश राणे यांना आपला पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे असे अनेक प्रवेश केले जात आहेत. नारायण राणे भाजपमध्ये आल्यामुळे मूळ भाजपची वाढ खुंटली आहे.
BJP Second List: भाजपची दुसरी यादी जाहीर, २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा; पाहा कोणाला संधी मिळाली
नारायण राणे हे गेले ३५ वर्ष मंत्री आहेत, मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री तसेच उद्योग मंत्री देखील झाले, मात्र या जिल्ह्यामध्ये कोणताही उद्योग आणले नाहीत. फक्त राणेंना सत्ता पाहिजे. आपल्या घरातच आमदार,खासदार झाले पाहिजे, असा आरोप संदेश पारकर यांनी केलाय. यावेळी विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होती.
राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाची दुसरी यादी जाहीर; २२ मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा, तिसऱ्या यादीबाबत जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
कणकवली विधानसभेची मला उमेदवारी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे आभार मानत आहे. या जबाबदारीसाठी मला योग्य ठरवले त्याबद्दल धन्यवाद, आपण टाकलेला विश्वास हा नक्कीच सार्थकी ठरवेल असे पारकर यांनी सांगितले. या मतदारसंघांमध्ये 21000 पेक्षा जास्त मताधिक्याने माझा विजय होईल, असा विश्वास पारकर यांनी दिलाआहे.

जिल्ह्यातील ,शिवसैनिकांना,महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो,या मतदार संघात दलित,मराठा,मुस्लिम,धनगर अनेक समाज आहेत,त्यांना आरक्षण मिळाले नाही. या मतदारसंघांमध्ये नितेश राणे यांच्याकडून मुस्लिम समाजाचा दोष निर्माण केला जात आहे. त्यामुळे होणारे या निवडणुकीमध्ये सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचा वक्तव्य संदेश पारकर यांनी म्हटले आहे.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.