Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिंदेंच्या माजी खासदारासमोर महायुतीतूनच मोठे आव्हान, भाजपच्या ज्येष्ठ नेत्याकडून नामांकन अर्ज दाखल

4

Risod Vidhan Sabha Shivsena Vs BJP : वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेच्या भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाली असली मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यानेही शड्डू ठोकला आहे. रिसोड मधील भाजप नेते अनंत देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Lipi

पंकज गाडेकर, वाशिम : वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेच्या भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाली असली मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यानेही शड्डू ठोकला आहे. रिसोड मधील भाजप नेते अनंत देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अनंत देशमुख हे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आणि माजी खासदार असून त्यांनी वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१९ची विधानसभा निवडणुक त्यांनी अपक्ष लढवली असता काँग्रेसच्या अमित झनक यांनी त्यांचा पराभव केला होता. आता ते भाजपमध्ये असून रिसोड विधानसभा मतदारसंघात त्यांनी उमेदवारीवर दावा केला आहे.

रिसोड विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या पारड्यात पडली असताना अनंत देशमुख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील प्रमुख नेते यावर काय तोडगा हे पाहणे महत्वाचे आहे. तरीही माझ्या उमेदवारी वर पक्ष उद्यापर्यंत पक्ष निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया अनंत देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
Sharad Pawar: निवडणुकीच्या मैदानात उतरण्याआधी वस्तादाचा सल्ला, युगेंद्र पवारांबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले?
यावर प्रतिक्रिया देताना भावना गवळी म्हणाल्या की, भाजपकडून येथे उमेदवारी दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ही जागा महायुतीतील शिवसेनेला सुटलेली आहे आणि मीच येथील उमेदवार आहे. त्यामुळे भाजपकडून कोणी उमेदवारी दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही. या भागातील सर्व मित्र पक्ष माझ्यासोबत आहेत आणि माझ्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे.

तर ‘रिसोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप दोघांचेही उमेदवार राहतील, इथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्याम बढे यांनी सांगितले होत. तर मैत्रीपूर्ण लढतीबद्दल पत्रकारांनी भावना गवळी यांना विचारले असता असा कुठलाही प्रकार होणार नाही. ही जागा स्पष्टपणे महा युतीतील शिवसेना पक्षाला सुटली आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रश्नचं येत नाही, ही निव्वळ चर्चा आहे आणि काही भाजपचे नाराज नेते असतील त्यांना समजावण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे करतील, असा विश्वास असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले. आता भाजपचे प्रमुख नेते यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.