
Tej Police Times
दिवाळीमधील महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी, याला धनतेरस असेही म्हणतात. सुख समृद्धी आणि धन-धान्य, संपत्ती वाढविणारा हा दिवस असून या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशी दिवशी खास पूजा करतात. या दिवशी काही खास उपाय केले तर तुमच्या इच्छा पूर्ण होवून धन-संपत्तीत वाढ होते. माता लक्ष्मीची खास कृपा तुमच्यावर राहते. चला तर मग धनत्रयोदशीच्या रात्री कोणते उपाय करावेत ते पाहूया
तंत्र शास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या रात्री १३ तुपाचे दिवे लावा. या दिव्यांमध्ये कवडी टाका. घराच्या अंगणात हे दिवे ठेवा आणि मध्यरात्र झाली की त्या कवड्या काढून घ्या आणि घरातील कोणत्याही कोपऱ्यात गाडून टाका. यामुळे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच नोकरी-व्यवसायात यश मिळेल.
धनतेरसच्या संध्याकाळी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करताना पूजेमध्ये 5 गोमती चक्र घ्या. गोमती चक्रांवर चंदन आणि केशराने महालक्ष्मीचे नाव लिहा आणि मग माता लक्ष्मीच्या जवळ ठेवा. नंतर विधीवत पूजा करून ती गोमती चक्र लाल वस्त्रात बांधून तिजोरीत ठेवा. असे केल्याने धन -धान्यात वाढ होते तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या संध्याकाळी तुम्हाला जर किन्नर दिसला तर त्यांना दान करा. तसेच त्यांच्याकडून एक नाणे मागून घ्या. सहसा किन्नर असे नाणे देतात. ते नाणे नेहमी तुमच्या पर्समध्ये किंवा धनसंपत्ती जिथे ठेवता तिथे ठेवा.
असे केल्याने तुमच्याकडे कायम पैशांची भरभराट राहील, सर्व कामे पूर्ण होतील.
धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करतात. यावेळी केशर आणि हळदीच्या पाण्याने रंगवलेले २१ अक्षत म्हणजे अखंड तांदूळ घ्या. तांदूळ तुटलेला नसावा याची काळजी घ्या. माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करतात, ते २१ तादूंळ पूजेत ठेवा आणि त्यानंतर लाल रंगाच्या वस्त्रात बांधून घराच्या किंवा व्यवसाय जिथून करता तेथील दरवाज्यावर लटकून ठेवा. यामुळे सुखसमृद्धी वाढेल. गरजवंतांना तांदूळाचे दान करा.
धनतेरसच्या संध्याकाळी वडाच्या पारंब्यांना गाठी मारा आणि पाच कौड्या घेवून त्याला हळदीचा टीळा लावा. त्या कवड्या तुमच्या वरून 8 वेळा उतारवा आणि
एखाद्या गरीब व्यक्तीस धन किंवा पैशांसोबत दया, यामुळे अचानक धन प्राप्त होते.
धन मिळाल्यानंतर वट वृक्षाच्या पारंब्यांना बांधलेली गाठ सोडून द्या.
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी झाडू अवश्य खरेदी करा. धनतेरसच्या पूजे आधी या झाडूने थोडी साफसफाई करा, नंतर ती एका बाजूला ठेवा. मग दुसऱ्या दिवशी या झाडूचा वापर करा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.