
Tej Police Times
दिवाळीनंतर आता थंडीचाही जोर वाढला आहे. आरोग्यासाठी हिवाळा अधिक पोषक मानला जातो. हिवाळ्यात भूक वाढते, त्यामुळे शरीराचा पोषणकाळ म्हणून हिवाळ्याकडे बघितले जाते. अशातच थंडीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी उष्म पदार्थांचे सेवन केले जाते. शरीराला उष्णता देणारे पदार्थांचे सेवन केल्याने पोषणासह त्वचेसाठीही मदत होते असा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जात असतो. त्यामुळे घरोघरी पौष्टिक लाडूंसाठी दिवाळीनंतर सुकामेव्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, गेल्या महिनाभरात सुकामेव्याच्या दरांत मोठी वाढ झाल्याने नाशिककरांना अधिकचा फटका सहन करावा लागत आहे. यंदा काजू, मखाणा, अक्रोडच्या दरांत सर्वाधिक वाढ झाली असून बदाम, अंजीरचेही दर किरकोळ प्रमाणात वाढल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.
मालेगाव मध्य वगळता उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा महायुती जिंकेल; गिरीश महाजनांचा दावा
थंडीत आरोग्यासाठी सुकामेवा उत्तम मानला जातो. त्यामुळे पौष्टीक लाडू आणि दररोजच्या सेवनासाठी सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दरांतही मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना फटका बसत आहे.– नीरज बोथरा, व्यावसायिक
Nashik News: सिंहस्थासाठी हवे स्वतंत्र प्राधिकरण; मान्यवरांचा सूर, विकासकामांना चाल देण्याचे साकडे
असे आहेत दर (प्रतिकिलो)
अंजीर : १३०० ते २०००
मखाणा : १२०० पासून
अक्रोड : १३०० पासून
पिस्ता : ११०० पासून
काजू : १००० ते १६००
बदाम : ७६० ते १०००
किसमिस : २८०
लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.