
Tej Police Times
”काय काय जण विकास कामे घेतात. मात्र त्याचा दर्जा इतका खालवतात आणि पुढे तेच काम सहा सहा महिन्यात खराब होऊन जातात. त्यामुळे माझी बदनामी होते. मग निघतं मलिदा गॅंग..! हेच काम जर शेजारच्या तालुक्याला दिले. तरी ते म्हटले असते बघा, बाकीच्या तालुक्यांना फायदा करून देतात आणि आपल्या तालुक्यातील लोकांना वाऱ्यावर सोडतात. तरुण तरुणींनी कुठे जायचं…अरे इथंच राहायचं पण काम चांगलं करायचं, हे नको का कळायला? मी कुणाला पाठीशी घालतोय की कुणाच्या कामावर पांघरुन घालून वेडवाकडं काम करुन घेतलं आहे?” असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
”परत परत निधी द्यायला सरकार काही मोकळं नाहीय. सरकारला ३५८ तालुके सांभाळायचे आहेत. त्या गोष्टीचा विचार जे पदाधिकारी आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे किंवा तुमच्यासारख्या वडिलधाऱ्या माणसांनी सांगितलं पाहिजे. कुणीही स्वत:चा इगो ठेवू नका, प्रत्यकाने माझ्याकडे बघून त्या निवडणुकीमध्ये भाग घ्या. नाहीतर रागारागाने निघून जायचं, तुम्ही जाणार पण माझं काय होणार?” असं मिश्किल टिप्पणी केल्यानंतर सभेत एकच हशा पिकला.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.