
Tej Police Times
“भाजपाचे लोक जिथे चोऱ्या माऱ्या करुन जागा जिंकतात तिथे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सावध रहायला सांगितले आहे .
बाळासाहेबांवर यांचं खरं प्रेम असतं तर यांनी गैरमार्गाने बाळासाहेबांचा पक्ष फोडला नसता.उलट बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष महाराष्ट्रात एक इंचही पुढे सरकू शकत नाही. आम्ही सातत्याने सांगत आहोत की वीर सावरकरांना भारतरत्न द्या! मग का देत नाही आहात? त्यांना भारतरत्न देणं हे अमित शहांच्या हातात आहे.”काश्मीरमधून कलम ३७० मैंने हटाया,मैंने हटाया म्हणत स्वतःची पाठ थोपटवून घेणाऱ्या अमित शहांना कोणी अडवलं आहे? तुम्ही तुमच्या पोस्टर आणि बॅनरवरचे बाळासाहेबांचे फोटो काढा,लोक तु्म्हाला महाराष्ट्रात उभं करणार नाहीत” असा सणसणीत टोला राऊतांनी लगावला.
“एक व्यापारी आपल्या धंद्यासाठी नेहमी खोटं बोलतो आणि अमित शहा हे व्यापारी आहेत.काश्मीर मधून कलम ३७० हटवून ना काश्मीरचा फायदा झाला ना देशाचा काही फायदा झाला.काश्मीरमध्ये एकही रोजगार आला नाही फक्त गौतम अडाणींसाठी जमिनी मोकळ्या झाल्या.आपल्या जवानांवर होणारे हल्ले आजही सुरू आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणात जो चिखल झाला आहे तो अमित शहांमुळे झाला आहे” अशी आगपाखड राऊतांनी केली.
लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.