
Tej Police Times
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी पाच जागा अशा होत्या ज्यात विजयाचे अंतर १ हजार पेक्षा कमी मतांचे होते. एक जागा तर अशी होती येथे विजयाचे अंतर ५०० पेक्षा कमी होते. हा विजय शिवसेनेच्या भाऊसाहेब लांडे यांनी मिळवला होता. चांदीवली मतदारसंघातून त्यांनी फक्त ४०९ मतांनी विजय मिळवला होता.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोगरा मतदारसंघातून चंद्रिकापुरे गोवर्धन यांनी ७१८ मतांनी विजय मिळवला होता. तर पुण्यातील दौंडमधून राहुल कुल यांनी ७४६ मतांनी बाजी मारली होती. असाच विजय सांगोलामधून शाहजी बापू पाटील यांनी मिळवला होता, त्यांनी ७६८ मतांनी विजय मिळवला. नगरमधील कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशितोष काळे यांनी ८२२ मतांनी बाजी मारली होती.
राज्यातील भाजपच्या राष्ट्रीय नेत्याने सांगितला निवडणुकीचा निकाल; अजित पवारांना फक्त २५ जागा, मविआमध्ये ठाकरे गटाचा स्ट्राइक रेट सर्वात…
या शिवाय एक दो दोन हजार मतांच्या फरकाने भिवंडी पूर्व, मूर्तिजापूर, मुक्ताईनगर आणि बीड येथील निकाल लागले होते. या मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी, सपा आणि अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. २०१९ साली २८ जागा अशा होत्या येथे विजयाचे अंतर २ ते ५ हजार इतके होते. यातील १२ जागांवर भाजपने, ६ जागांवर राष्ट्रवादी, ४ जागा काँग्रेस, २ जागा शिवसेना तर एआयएमआयएम, बहुजन विकास आघाडी, भाकप यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती. एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली होती.
निवडणुकीत ३१ जागा अशा होत्या येथे विजयाचे अंतर ५ हजार पेक्षा कमी होते. या ३१ पैकी १६ मतदारसंघात माहविकास आघाडीने लीड घेतले होते तर १५ जागांवर महायुतीला आघाडी मिळाली होती. या निकालाकडे पाहिले तर ३७ जागांवर कोण बाजी मारणार यावर सत्ता कोणाला मिळेल याचा फैसला होऊ शकतो.
लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.