
Tej Police Times
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले आहेत. सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधून आम्ही तेलंगाणा राज्यात सहा विशेष योजना आणल्या आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यात तेलंगणा राज्य सरकारला यश आले आहे. या सहा योजना पाहण्यासाठी आम्ही पंतप्रधान यांना आवाहन करत आहे, महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना तेलंगाणा राज्यात पाठवून द्या. काही अडचणी आल्यास आम्ही विमान देखील पाठवून देतो. त्यांना तेलंगाणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणलेली विकास कामेही दाखवतो, असे रेवंत रेड्डी म्हणाले.
‘काँग्रेसने यांना गल्ली ते दिल्ली सन्मान मिळवून दिला, तरी…’ १८ मिनिटाच्या भाषणात रेवंत रेड्डींनी अशोक चव्हाणांना घेरले
भोकरचे विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नांदेडमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या १८ मिनिटाच्या भाषणात १२ मिनिट अशोक चव्हाणांनाच लक्ष्य केले. ‘काँग्रेसने चव्हाण यांना गल्ली ते दिल्ली मान सन्मान मिळवून दिला. तरी ही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. ज्या नांदेडकरांनी त्यांना नेता बनवले, त्यांनी पक्ष बदलून नांदेडचे नाव खराब केले आहे.’ असे रेड्डी म्हणाले. तर ‘महाराष्ट्राची निवडणूक ही गद्दारांना धडा शिकवण्यासाठीची निवडणूक आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोबत गद्दारी केली, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेसोबत गद्दारी करून गुजरातचे गुलाम बनले. अजित पवार यांनी शरद पवारांसोबत गद्दारी करून गुजरातचे गुलाम झाले.’ असे म्हणत रेवंत रेड्डींनी शिंदे पवारांवर देखील निशाणा साधला.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.