
Tej Police Times
लग्नसराईचा काळ सुरु झाला असून अनेकजण लगीन घाईच्या तयारीत आहेत. या काळात बरेच अविवाहित मंडळी आपल्यासाठी जोडीदार शोधत असतात. मुला-मुलींनी पंसत केल्यावर कुंडली जुळवणे फार महत्त्वाचे आहे.
हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी लग्न करतात तेव्हा त्यांच्या कुंडली जुळवणे हा भविष्यातील समस्या टाळण्याचा एकमेव मार्ग आहे. दोघांच्या कुंडली जुळल्या की, गुणांची जुळणी, मंगळ दोष, नाडी दोष पाहिले जाते.
जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती लक्षात घेऊन ही पत्रिका बनवली जाते. लग्नाच्या वेळी मुलगा आणि मुलगी यांची पत्रिका जुळवली जाते. वैवाहिक दृष्टिकोनातून पत्रिकेचा पूर्णपणे अभ्यास करुन ती जुळवली जाते. यामध्ये मृत्युषडाष्टक योग, अष्टकूट, दशा कल्पना यांसारख्या गोष्टी देखील पाहिल्या जातात. एक चरण किंवा एक नाडी असल्यास लग्न करणे योग्य आहे का हे देखील पाहिले जाते.जाणून घेऊया लग्न जुळवण्यासाठी ३६ पैकी किती गुण जुळणे आवश्यक आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत नाडी दोष, मंगळ दोष, गण दोष या गोष्टी पाहिल्या नाही तर वधु-वरांच्या वैवाहिक जीवनात समस्या येतात. यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार या सगळ्या गोष्टींची तपासणी केल्यानंतर लग्न करायला हवी.
लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.