तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

१७५ जागांसह राज्यात नवे सरकार स्थापन होणार; नवा एक्झिट पोल जाहीर झाला! महायुती, ‘मविआ’ला किती जागा?

0 36

Todays Chanakya Exit Poll: टुडे्स चाणक्यचा एक्झिट पोल मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर २४ तासांनी जाहीर झाला असून या पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: राज्यातील विक्रमी मतदानानंतर सर्वांच्या नजरा या २३ तारखेच्या निकालाकडे लागल्या आहेत. अशात मतदानानंतर समोर आलेल्या विविध एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. काल अनेक संस्थांनी त्यांचे अंदाज वर्तवले होते. मात्र २०१४च्या लोकसभा निवडणुकीचा अचूक अंदाज वर्तवणारे टुडे्स चाणक्य मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपले अंदाज जाहीर केले आहेत.

चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येऊ शकते. या एक्झिट पोलनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला १७५ जागा मिळतील असा अंदाज आहे. या अंदाजात ११ जागा कमी जास्त होऊ शकतात. तर महाविकास आघाडीला १०० (११ जागा कमी जास्त) जागा मिळतील. अन्यला १३ जागा (५ जागा कमी जास्त) मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास महायुतीला ४५ टक्के, महाविकास आघाडीला ३९ टक्के तर अन्यला १६ टक्के मते मिळण्याची शक्यता चाणक्यने व्यक्त केली आहे.

पोल्स ऑफ पोलनुसार राज्यात महायुतीला १५५ जागा मिळतील. म्हणजे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १२२ जागांवर समाधान मानावे लागले. २८८ पैकी ११ जागा या अन्यला मिळतील असा पोल्स ऑफ पोलचा अंदाज आहे.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.