तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

The Sabarmati Report: विक्रांत मेस्सीच्या सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, सात दिवसांत इतक्याच कोटींची कमाई

0 37

The sabarmati report box office collection:गेल्या काही वर्षात देशात घडलेल्या घटनांवर सिनेमे आल्याचं दिसून आलं. एक-दीड वर्षांपासून द साबरमती रिपोर्ट या हिंदी सिनेमाची चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी हा सिनेमा प्रदर्शित झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: 12th fail चित्रपटानंतर विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्ट या सिनेमाची उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा प्रदर्शित झाला. १५ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाला सुरुवातीला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या, मात्र बॉक्स ऑफिसवर सिनेमा मागे पडल्याचं चित्र हे. सातव्या दिवशीही सिनेमानं फार काही कमाई केली नसल्यानं निर्मात्यांना मोठं नुकसान होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सातव्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे आता समोर आले आहेत. सात दिवसांत सिनेमानं आतापर्यंत केवळ १० कोटींचीच कमाई केल्याचं म्हटलं जात आहे.

एकता कपूर हिनं द साबरमती रिपोर्ट ची निर्मिती केली आहे. त्यामुळं सिनेमाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत सिनेमाचं कौतुक केलं होतं. पण सिनेमाची कमाई मात्र समाधानकारक नसल्याचं दिसून येत आहे.

सॅकनिल्कच्या रिपोर्टुनुसार सिनेमानं सातव्या दिवशी १.१० कोटींची कमाई केली आहे. सिनेमाचं एकूण कलेक्शन हे आता ११.४५ कोटी झालं आहे. चित्रपटानं पहिल्या दिवशी १.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी २.१ कोटी, तिसऱ्या दिवशी तीन कोटी, चौथ्या दिवशी १.१५ कोटी , पाचव्या दिवशी १.३ कोटी आणि सहाव्या दिवशी १.५५ कोटींची कमाई केली होती.

The Sabarmati Report: विक्रांत मेस्सीच्या सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, सात दिवसांत इतक्याच कोटींची कमाई

‘द साबरमती रिपोर्ट ,सिनेमाला मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ आणि हरियाणा टॅक्स फ्री करण्यात आलं होतं. असं असताना कमाईत वाढ होताना दिसत नाहीये. आता दुसऱ्या आठवड्यात सिनेमा किती कमाई करणार, यावर सिनेमाचं भविष्य अवलंबून आहे. कारण नंतर मोठे सिनेमा बॉक्स ऑफिसवर एन्ट्री करणार आहेत.

गुजरात इथं घडलेल्या गोध्रा हत्याकांडावर हा सिनेमा बेतला आहे.गोध्रा जळीतकांड आणि त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगली हा देशाच्या इतिहासातील एक दुर्दैवी घटनाक्रम आहे. त्या वेळी नक्की काय घडलं, या घटना एका पत्रकाराच्या दृष्टिकोनातून मांडल्या आहेत. गोध्रा जळीतकांड आणि त्यानंतरची गुजरातमधली स्थिती याबाबत आतापर्यंत प्रसार माध्यमांमधून सांगण्यात आलेल्या गोष्टीच इथं मांडण्यात आल्या आहेत. अंगावर येणारं, दाहक वास्तव मांडण्यासाठी आवश्यक असलेल्या सशक्त पटकथेचा अभाव वारंवार जाणवत राहतो.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.