
Tej Police Times
विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतंय. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त केली होती. ज्यावरून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. अशातच आता भाजप नेते अशोक चव्हाणांनीही पटोलेंना टोला लगावला आहे. पटोलेंचं स्वप्न स्वप्नच राहणार असं म्हणत चव्हाणांनी पटोलेंना चिमटा काढला. तसंच राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Source link
Recover your password.
A password will be e-mailed to you.