
Tej Police Times
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याआधी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीमध्ये जोर-बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्रिपदावरून चाललेल्या रस्सीखेचमध्ये फडणवीस अग्रेसर ठरल्याची माहिती समजत आहे. सोशल मीडियावर देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना गुच्छ देत असून त्यावेळी बाजूला उभे असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसून आली. तर फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरूनच आता फडणवीस यांच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. या फोटोवर संजय. राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना शिंदेवर निशाणा साधला आहे.
Maharashtra CM : शिंदे नको-नको म्हणतायत, पण भाजपला त्यांनाच उपमुख्यमंत्रिपद का द्यायचंय, तिसरं कारण विचार करायला लावणारं
उगवता सूर्य आणि मावळता सूर्य थोडातरी फरक असतो. उगवत्या सूर्याचे तेज एकाबाजूला दिसत आहे. दुसऱ्या बाजूला मावळतीचा सूर्य झुकताना वाकताना दिसत आहे, ढगाआड जातना दिसतोय. राजकारण आहे, राजकारणात काय होईल सांगता येत नाही, चंचल असतं राजकारण, असं संजय राऊत म्हणाले.
भले अण्णा हजारे झोपले, EVM घोटाळ्याविरूद्ध बाबा आढावांसारखा ज्येष्ठ नेता रस्त्यावर उतरला- संजय राऊत
मी कधी गंभीर असतो तर कधी हसरा असतो. बैठक सकारात्मक झाली असून आमची सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली आहे. आमच्यामध्ये समन्वय आहे, मी काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने सर्वांची काळजी घेतो, असं मोघम उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.