
Tej Police Times
दरम्यान महायुती सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम ठरला आहे. ५ डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. पण एकनाथ शिंदे अचानकपणे दरे गावी पोहोचले आहेत. शिंदे दोन दिवस तेथे मुक्कामी राहणार असून दोन दिवस महायुतीच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. तरीही मंत्रिपदाच्या वाटाघाटीमुळे राजकीय वातावरण मात्र गरम असणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे राज्यकारभारातील सर्वात महत्वाच्या खातं असलेल्या गृहखात्यावर अडून बसले आहेत. तर नगरविकास खात्यासह अन्य १२ खात्यांवर त्यांनी आपला दावा मजबूत केला आहे. पण मागच्या सरकारमध्ये भाजपकडे गृहखातं राहिलं असल्याने त्यांचा देखील यावर प्रबळ दावा आहे.
…आणि म्हणून शिंदे गेले गावाला! निघण्यापूर्वी आव्हाडांकडे ‘मन की बात’, वर्षावर काय घडलं आज?
महायुतीची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. दरम्यान अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, असेही एकनाथ शिंदेंनी नमूद केले होते. आता राज्याचा कारभारी कोण आणि सोबतच राज्य मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.