
Tej Police Times
वास्तुशास्त्रानुसार, घरात कधीही धान्याचे कोठार किंवा धान्याचे डबे ज्यात तुम्ही धान्य भरून ठेवता ते रिकामे ठेवू नका. समजा ते रिकामे राहीले तर तुमच्या प्रगतीला अडचणी निर्माण होतील. भरलेले धान्याचे कोठार धरात सुख समृद्धी घेवून येते. जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. दररोज माता अन्नपूर्णेची पूजा करा, कारण माता अन्नपूर्णा धन-धान्य, ऐश्वर्य आणि सौभाग्य यांची देवी आहे. माता अन्नपूर्णाची पूजा केली तर घरातील अन्नाचा, धान्याचा साठा कधीही रिकामा राहत नाही.
वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममधील बादली कधीही रिकामी ठेऊ नका. रिकामी बादली नकारात्मक ऊर्जा आणते, ज्यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही बादलीचा वापर करत नसाल तरी त्यात पाणी भरून ठेवा. कडा नसलेली किंवा तुटलेली बादली वापरू नका. बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरणे योग्य आहे. बादलीचा वापर झाल्यानंतर बादली पाण्याने भरून ठेवा, रिकामी ठेऊ नका.
देवघरात पूजा साहित्यासोबत जलपात्र ठेवतो. देवाला नैवेद्य दाखवताना त्यांना पाणी सुद्धा जलपात्रात ठेवले जाते. वास्तुशास्त्रानुसार, देवघरातील जलपात्र रिकामे ठेऊ नये. पूजा केल्यानंतर जलपात्रात पाणी, गंगाजल आणि एक तुळशीपत्र त्यात ठेवावे. असे मानले जाते की देवांना सुद्धा नैवेद्यासोबत पाणी ठेवणे गरजेचे आहे. पाण्याने भरलेलं जलपात्र देवघरात ठेवले तर देव समाधानी राहतात आणि घरात सुख-समृद्धी येत. जर देवघरातील जलपात्र रिकामे असेल तर घरात नकारात्मक प्रभाव राहतो तसेच आर्थिक संकटे येतात. म्हणून देवघरात जलपात्र कायम भरलेले असावे.
तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेऊ नका. तिथे थोडे पैसे किंवा धनसंपत्ती ठेवायला हवी. रिकामी तिजोरी किंवा पर्स तुम्हाला गरिबीकडे घेवून जाते. तिजोरीत किंवा पर्समध्ये नेहमी थोडेतरी पैसे किंवा धन ठेवायला हवे. तिजोरीत तुम्ही गोमती चक्र, शंख अगदी कवडी ठेवू शकता, यामुळे घरात सुखसमृद्धी वाढते.
जीभेला ठेऊ नका रिकामे हे वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की काय म्हणायचे आहे. जीभ ही देखील सुखसमृद्धीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जे बोलता त्यावरून तुम्ही कसे आहात ते समजते. म्हणूनच कदाचीत आपल्याकडे जीभेला लगाम घाल, जीभेला हाड आहे असे म्हटले जाते. जीभ रिकामी ठेऊ नका याचा अर्थ आहे कोणालाही अपशब्द बोलू नका. घरातील ज्येष्ठांचा अपमान करू नका. तुम्ही अपशब्द बोललात किंवा कोणाचा अपमान केला तर माता लक्ष्मी नाराज होते. आर्थिक संकटे येतात.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.