
Tej Police Times
ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या प्रत्येकाच्या जीवनात ग्रहांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या कुंडलीत ग्रहांच् प्रभाव यश, प्रगती मिळवून देण्यासाठी मदत करतात. तसेच ग्रहाच्या नकारात्मक परिणामामुळे समस्यांचा सामना देखील करावा लागतो.
बरेचदा आपण अधिक मेहनत करुन देखील आपल्याला हवा तसा परिणाम मिळत नाही. अशावेळी कुंडलीतील ग्रहांची स्थिती कमजोर समजावी. नवग्रहांमध्ये सूर्य देवाला ग्रहांचा राजा मानला आहे. सूर्याच्या महादशा एका राशीत सहा वर्ष असते. कुंडलीत सूर्य मजबूत असल्यास समाजात सन्मान आणि प्रगती मिळते. तर कुंडलीतील सूर्याला बलवान करण्यासाठी शास्त्रानुसार आपण माणिक रत्न धारण करायला हवे. जाणून घेऊया त्याचे महत्त्व आणि घालण्याची योग्य पद्धत.
माणिक रत्नाला रुबी म्हणून ओळखले जाते. संस्कृतमध्ये या रत्नाला पद्मराग, रविरत्न, कुरुविंद, सौगंधिका, वसू असे म्हणतात. त्याला रंग लाल आहे तर श्रीलंकेत आढणारा माणिक हलका पिवळसर रंगाचा असतो. या रत्नाची ओळख अशी की, सूर्यप्रकाशात ठेवल्यावर लाल रंगाची किरणे सर्वत्र पसरलेली पाहायला मिळतात.
1. जर कुंडलीतील लग्न स्थानात रवि असेल तर माणिक रत्न धारण करायला हवे.
2. जर व्यक्तीच्या कुंडलीत रवि तिसऱ्या घरात असेल तर तो माणिक रत्न धारण करू शकता.
3. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चतुर्थ भावात रवि असेल तर त्या व्यक्तीला उत्पन्नात अडथळे येत असतील तर मंगळ आणि गुरू ग्रह असलेल्या लोकांनी माणिक रत्न धारण करणे फायदेशीर ठरते.
4. कुंडलीच्या सातव्या घरात सूर्य असेल तर व्यक्तीला अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत ज्योतिषाचा सल्ला घेऊनच रत्न धारण करावे.
5. जर एखाद्याच्या कुंडलीत सूर्य दुसऱ्या आणि बाराव्या भावात असेल तर अशा व्यक्तीला डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता असते. अशा वेळी एखाद्या योग्य ज्योतिषाला तुमची कुंडली दाखवल्यानंतरच तुम्ही रत्न धारण करु शकता.
6. जर कुंडलीच्या आठव्या घरात सूर्य असेल तर माणिक रत्न धारण करू नये.
7. जर सूर्य सहाव्या भावात असेल आणि त्याची विमशोत्तरी महादशा आणि अंतरदशा चालू असेल तर तुम्ही हे रत्न धारण करू शकता.
8. जन्म किंवा संक्रमणाचे चिन्ह वृषभ, तुळ, मकर किंवा कुंभ असल्यास, योग्य ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार माणिक रत्न धारण करावे.
9. मिथुन राशीतील तिसऱ्या घराचा स्वामी सूर्य आहे. अशा वेळी रत्न घालणे टाळावे.
10. कन्या राशीतील व्याय स्थानाचा स्वामी सूर्य आहे. अशा वेळी रत्न धारण करू नये.
रविवार हा सूर्य देवाला समर्पित करण्यात आला आहे. हे रत्न फक्त रविवारीची घालणे चांगले असते. रविवारी पुष्य, कृतिका, उत्तराषाढ, उत्तराभाद्रपद यापैकी एक नक्षत्र असल्यास सूर्योदयापासून सकाळी ९.०० वाजेपर्यंत विधीनुसार तुम्ही तुमच्या करंगळीत सोन्याच्या किंवा तांब्याच्या अंगठीत किमान पाच कॅरेटचा माणिक घालू शकता. जेव्हा तुम्ही हे रत्न धारण कराल तेव्हा सूर्याच्या मंत्रांचा जप करावा. ‘ओम घृनिहा सूर्याय नमः’ या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.
लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस.… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.