तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हिट की फ्लॉप? पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर इतकीच कमाई

0 25

Emergency box office collection day 1:अभिनेत्री कंगना रणौत हिचा इमर्जन्सी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी सिनेमानं फार समाधानकारक कमाई केल्याचं चित्र नाहीये.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर ‘इमर्जन्सी’कडून कंगना रणौतला मोठ्या अपेक्षा होत्या गेल्या तीन वर्षांपासून ती या चित्रपटावर काम करत होती. अनेक अडचणींनंतर हा सिनेमा आता प्रदर्शित झालाय. पण हा सिनेमाही कंगनाच्या अपेक्षा पूर्ण करताना दिसत नाहीये.

इमर्जन्सी सिनेमा काल म्हणजेच १७ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.देशात काही ठिकाणी इमर्जन्सी चित्रपटावर बंदी आहे. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटानं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फक्त अडीच कोटींच्या जवळपास कमाई केल्याचं पाहायला मिळतंय.

९९ रुपये किंमत
तर इमर्जन्सी सिनेमा प्रदर्शित झाल्या नंतर पहिल्याच दिवशी खास ऑफरही होती. नॅशनल सिनेमा लव्हर्स डे निमित्तानं सिनेमाचं तिकीट हे ९९ रुपये इतकं होतं. पण याचा फायदा सिमेला झाला नाहीये.

दुपारच्या शोची १०-१३ टक्के तिकीटांची विक्री झाली होती. तर सायंकाळी आणि रात्री ३६ टक्के तिकीटांची विक्री झाली होती.इमर्जन्सीनं २.५० कोटींचं ओपनिंग केलं असलं तरी, कंगनाच्या मागील सिनेमांपेक्षा हे जास्त आहे. २०२३मध्ये प्रदर्शित झालेल्या कंगनाच्या तेजस सिनेमानं १.२५ कोटींची कमाई केली होती.

काय हे सिनेमाचं कथानक?
कंगनाची ही बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ ही कलाकृती देशाच्या इतिहासातील सर्वांत वादग्रस्त प्रकरणांपैकी एकावर प्रकाश टाकते, अर्थात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेली १९७५ची आणीबाणी.

राजकीय अशांतता आणि वाढता विरोध या पार्श्वभूमीवर आणीबाणीची बीजं पेरली गेली. निवडणूक गैरव्यवहारांमुळं इंदिरा गांधींचा १९७१च्या निवडणुकीतला विजय रद्द ठरविणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या पायाखालची राजकीय जमीन सरकू लागली. या निकालामुळं त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली; ज्यामुळं भ्रष्टाचार आणि गैरकारभाराविरुद्ध व्यापक निषेध करण्यात आला.

वाढत्या दबावाला तोंड देत इंदिरा गांधींनी सत्तेवर आपली पकड मजबूत करणं पसंत केलं. २५ जून १९७५ रोजी त्यांनी अंतर्गत गडबडीचे कारण देत भारतीय संविधानातलं कलम ३५२ लागू केलं; त्यानंतरचा २१ महिन्यांचा कालावधी असा होता ज्या दरम्यान नागरी स्वातंत्र्यावर प्रतिबंध लादण्यात आले. राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि प्रसारमाध्यमांची गळचेपी करण्यात आली. एक लोकशाही देश हुकूमशाही राजवटीत बुडून गेला.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ” महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हाताळण्याचा सहा वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांच्या लिखाणाची आवड.”आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.