Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Modi Kumbh Snan : कुंभस्नानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 फेब्रुवारी हा दिवस का निवडला? जाणून घ्या खास कारण
PM Modi Shahi Snan : पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात कुंभ स्नानासाठी सहभागी होणार आहेत. पण त्यांनी हाच दिवस का निवडला? याबदद्ल सगळ्यांना उत्सूकता आहे. कारण मौनी अमावस्या आणि वसंत पंचमी हे दिवस शाहीस्नानासाठी शुभ मानले जातात मग 5 फेब्रुवारी निवडण्यामागे खास कारण काय आहे, चला जाणून घेऊया.
What is special in Kumbh Mela 2025 :
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात कुंभ स्नानासाठी सहभागी होणार आहेत. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. दरम्यान अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झालेले आहेत, जसे की शाही स्नानासाठी मौनी अमावस्या किंवा वसंत पंचमी यासारखे शुभ दिवस सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 फेब्रुवारी हाच दिवस का निवडला? 5 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये मतदान होत आहे. मग काय खास आहे 5 फेब्रुवारी रोजी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज येथे येणार आहेत. खरंतर यामागे काही विशेष कारणं आहेत आणि जेव्हा तुम्हाला त्याचे महत्त्व समजेल तेव्हा तुम्ही देखील म्हणालं, पंतप्रधान मोदी खरंच एक स्मार्ट पीएम आहेत.
5 फेब्रुवारी हाच दिवस का निवडला?
5 फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी आहे. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस तप,ध्यान-धारणेसाठी उत्तम आहे. तसेच यादिवशी भीष्माष्टमी देखील आहे. धार्मिक कथेनुसार आणि महाभारतात सांगितल्याप्रमाणे कुरुक्षेत्रात झालेल्या कौरव- पांडवांच्या युद्धात भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर अंतिम घटका मोजत होते. ते उत्तरायण आणि शुक्ल पक्षाची प्रतीक्षा करत होते. जेव्हा हा शुभ आणि पुण्यकाळ माघ महिन्याच्या अष्टमी तिथीला आला, तेव्हा भीष्म पितामह यांनी भगवान श्रीकृष्णासमोरच आपले प्राण शरीरापासून वेगळे करून मोक्ष प्राप्त केला.
पुराणशास्त्र काय सांगते?
शास्त्रांमध्ये म्हटले आहे की, माघ महिन्याच्या अष्टमी तिथीला जी व्यक्ती पवित्र नदीत स्नान करते आणि पूर्वजांचे ध्यान करून त्यांच्या नावाने जल, तिळ, अक्षत आणि फळं अर्पण करुन तर्पण करते त्यांना पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. म्हणूनच, धार्मिक दृष्टिकोनातून माघ महिन्याची अष्टमी तिथी अत्यंत पुण्यकारक आणि शुभ मानली जाते.