Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mauni Amavasya 2025 : मौनी अमावस्येला त्रिवेणी संयोग! पितरांच्या शांतीसाठी करा हे ५ उपाय, धनप्राप्तीत होईल वाढ
Dhanprapti Sathi Upay : आज पौष महिन्यातील मौनी अमावस्येची तिथी आहे. हिंदू धर्मात मौनी अमावस्येला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. मौनी अमावस्येला स्नान आणि दान करण्याचे महत्त्व फार मोठे मानण्यात आले आहे. मौनी अमावस्येला काही विशेष उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच घरात देवी लक्ष्मीचा वास राहातो.
आज पौष महिन्यातील मौनी अमावस्येची तिथी आहे. हिंदू धर्मात मौनी अमावस्येला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. मौनी अमावस्येला स्नान आणि दान करण्याचे महत्त्व फार मोठे मानण्यात आले आहे.
यंदा मौनी अमावस्येला त्रिवेणी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. सुख-समृद्धीसाठी त्रिवेणी योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मौनी अमावस्येला काही विशेष उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तसेच घरात देवी लक्ष्मीचा वास राहातो. त्यामुळे मौनी अमावस्येला कोणते उपाय करायला हवे जाणून घेऊया.
दिवा लावा
![](https://static.langimg.com/thumb/117670057/maharashtra-times-117670057.jpg?width=700&height=394&resizemode=75)
मौनी अमावस्येला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. दिव्यामध्ये कापसाऐवजी लाल धाग्याची वात आणि कुंकू टाकावे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. असे केल्याने धनप्राप्ती देखील होईल.
खीर दान करा
![](https://static.langimg.com/thumb/117670036/maharashtra-times-117670036.jpg?width=700&height=394&resizemode=75)
मौनी अमावस्येला दान-धर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी गरीबांना आणि गरजू लोकांना खीर दान करा. तसेच देवी लक्ष्मी आणि शंकराला नैवेद्य म्हणून खीर दाखवा. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी कायम राहते.
अन्नदान करा
![](https://static.langimg.com/thumb/117669995/maharashtra-times-117669995.jpg?width=700&height=394&resizemode=75)
मौनी अमावस्येला मुंग्या, मासे आणि पक्ष्यांना खायला दिल्याने आर्थिक चणचण दूर होते. या दिवशी मुंग्यांना साखर, पीठ, माशांना पिठाचे गोळे आणि पक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे असे केल्याने घरात सुख- समृद्धी कायम राहाते.
तुळशी जवळ दिवा लावा
![](https://static.langimg.com/thumb/117669979/maharashtra-times-117669979.jpg?width=700&height=394&resizemode=75)
मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा. त्याच्या भोवती १०८ वेळा परिक्रमा करुन आशीर्वाद घ्या. असे केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी वाढते. त्यामुळे भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो.