
Tej Police Times
मौनी अमावस्येला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. दिव्यामध्ये कापसाऐवजी लाल धाग्याची वात आणि कुंकू टाकावे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. असे केल्याने धनप्राप्ती देखील होईल.
मौनी अमावस्येला दान-धर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी गरीबांना आणि गरजू लोकांना खीर दान करा. तसेच देवी लक्ष्मी आणि शंकराला नैवेद्य म्हणून खीर दाखवा. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी कायम राहते.
मौनी अमावस्येला मुंग्या, मासे आणि पक्ष्यांना खायला दिल्याने आर्थिक चणचण दूर होते. या दिवशी मुंग्यांना साखर, पीठ, माशांना पिठाचे गोळे आणि पक्ष्यांना अन्न व पाणी द्यावे असे केल्याने घरात सुख- समृद्धी कायम राहाते.
मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावा. त्याच्या भोवती १०८ वेळा परिक्रमा करुन आशीर्वाद घ्या. असे केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी वाढते. त्यामुळे भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळतो.
लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस.… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.