
Tej Police Times
वाचा: ‘शरद पवारांना मी मोठा नेता मानत नाही, तुम्ही मानत असाल तर तो तुमचा प्रश्न’
मागील आठवड्यात २३ जून रोजी फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राज्यपालांना मागण्यांची दोन निवेदनं दिली. त्यापैकी एक विधिमंडळ अधिवेशनाशी (Maharashtra Assembly Session) संबंधित आहे तर दुसरं ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आहे. त्याच निवेदनांच्या अनुषंगानं राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
काय आहेत फडणवीसांच्या तीन मागण्या?
विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी केवळ दोन दिवसांचा ठेवण्यात आला आहे. राज्यापुढं सध्या अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळं सरकारनं चर्चेपासून पळ न काढता अधिवेशनाच्या कालावधीत वाढ करावी.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेलं विधानसभेचं अध्यक्षपद तातडीनं भरण्यात यावं.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं सध्याच्या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत.
राज्यपालांनी या मागण्यांची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. ‘फडणवीसांनी मांडलेले तिन्ही विषय महत्त्वाचे आहेत. त्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती मला द्यावी,’ असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.
वाचा:काँग्रेसनं मोठे बदल टाळले; विधानसभा अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांचं नाव?
Recover your password.
A password will be e-mailed to you.