Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

निवडणुक खर्चाचा हिशोब मुदतीत न दिल्याबाबत आडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचासह ११ सदस्यांच्या अपाञतेचा अर्ज जिल्हाधिकार्यांनी फेटाळला..!

7



एरंडोल: तालुक्यातील आडगाव येथे गेल्या वर्षी झालेल्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत निवडणुक खर्चाचा हिशोब निर्धारीत वेळेत दिला नाही म्हणुन सरपंच सुनिल दिलीप भिल,उपसरपंच दिलीप नत्थू पवार व ११ सदस्यांना अपाञ ठरविण्यात यावे असा विवादार्ज डॉ.प्रविण वाघ यांनी जिल्हाधिकारी,जळगाव यांच्याकडे केला होता.
दाखल अर्जावर चौकशी होऊन सबळ पुराव्याअभावी व मुदतीत निवडणुक खर्च सादर केला असल्याचे सिध्द झाल्यामुळे जिल्हाधिकार्यांनी सदरचा अपाञतेचा अर्ज फेटाळला असुन सरपंच, उपसरपंच व सदस्यांना पाञ ठरविण्यात आले आहे.

एरंडोल तालुक्यातील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक गेल्यावर्षी चुरशीत पार पडली होती. सरपंच सुनिल भिल, उपसरपंच दिलीप पवार, सदस्य सुदाम पाटील,शारदा धीरज पाटील,रविंद्र हरी साबळे, संगीता रविंद्र महाजन,माया भैय्या वनवे, कविता दिनेश देवरे,आशा गुलाबराव साबळे,सीमा राहूल महाजन,मुक्ताबाई जोरसिंग राठोड, सखुबाई सुखदेव माळी यांनी निवडणुक खर्चाचा हिशोब निवडुन आल्याच्या तारखेपासुन ३०दिवसांच्या आत विहीत मुदतीत विहीत रितीने दिला नाही म्हणुन त्यांना सदस्य पदावरून अपाञ ठरविण्यात यावे असा विवाद अर्ज कलम १४(ब) प्रमाणे डॉ.प्रविण वाघ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्याकडे केला होता.
त्याबाबत चौकशी होऊन सदस्यांनी शपथपञासह दैनंदिन खर्चाची बीले विहीत मुदतीत विहीत रितीने सादर केलेली आहेत. लोकशाही मार्गाने जनतेतुन निवडुन आलेल्या सदस्यांना तांञिक कारणाने अपाञ ठरविता येणार नाही असा अँड. विश्वासराव भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून दाखल विवाद अर्ज फेटाळण्यात आला व सरपंच,उपसरपंचासह ११ ग्रामपंचायत सदस्यांना पाञ ठरविण्यात आले. असा महत्वपूर्ण निकाल जिल्हाधिकार्यांनी दिला.
या निकालामुळे आडगाव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

सरपंच, उपसरपंच व ११ ग्रामपंचायत सदस्यांतर्फे अँड. विश्वासराव भोसले यांनी कामकाज पाहीले.
या निकालाकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागुन होते.

सत्याचा विजय झाला,गावातील विकासकामांना खिळ घालणार्या लोकांना चपराक बसली आहे. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे अशी प्रतीक्रीया उपसरपंच दिलीप पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.